Saturday 25 July 2015

रात्रीचे बारा वाजले होते ....सर्वत्र काळोख पसरला होता.... शहरापासून दहा किलोमीटर वर गणूदाच गाव होत ... आणि गावाबाहेर शेतात त्याच घर होत ....तो निघाला होता तेंव्हा आभाळ कोरड होत ... अन आता त्या पावसाने रुद्र रूप धारण केल होत .... विजा कडाडत होत्या .... त्याची ती जुनी बाइक त्याची अजूनही साथ देत होती .. कुठे थांबून काही फायदा होणार नव्हता ....लवकरात लवकर घरी पोहोचायचं होत त्याला..... पण तो कच्चा रस्ता आता पूर्ण निसरडा झाला होता .. आजूबाजूची झाडी भयाण वाटत होती .... पण त्याला ..... त्याला या सर्वांशी काही देण घेण नव्हत ..... त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता ....एक रहस्य.... एक गूढ..... त्याचा मेंदू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता ...... डोक्यातील विचार चक्र वेगाने फिरत होते..... पण उत्तर सापडत नव्हत.... आणि अचानक..... एका वळणावर..... मोठा प्रकाश झोत त्याच्या डोळ्यावर पडला ... हॉर्न चा कर्कश्य आवाज कानात घुमला .... समोरून ट्रक आला होता.... याने जोरात ब्रेक मारला पण काही उपयोग नाही झाला .... एक झोरदार धडक त्याला बसली..... एका दगडावर त्याच डोक आपटलं गेल..... तो शेवटचे काही श्वास घेत होता.... पण त्याला जगायचं होत..... ते रहस्य जाणून घेण्यासाठी ..... त्याला त्या प्रश्नाचे उत्तर हव होत.... पण त्याचे श्वास कमी पडले.... आणि त्या अनुत्तरीत प्रश्नासह हे जग सोडून तो निघून गेला.....गाव हळहळत होत... बिचारा मुव्ही पाहायला म्हणून गेला आणि अपघातात गेला... पण म्हणतात न..... ज्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतात किंवा काही इच्छा अपूर्ण राहतात त्याची आत्मा पण अतृप्त राहते.... आणि ती आत्मा पण भटकत राहते..... त्या प्रश्नाच उत्तर शोधत.... . असच काहीस घडल होत का गणूदा च्या बाबतीत ......???

काहीच दिवसानंतर रात्री दोघे त्याच निर्जन रस्त्यावरून बाईक वरून चालले होते.... गणूदाच्या अपघाताची घटना ताजीच होती.... मनात कुठे न कुठे भीती होतीच म्हणून खूप सावकाश चालले होते ते.... झाडीतून मधेच काहीतरी सळसळण्याचा आवाज येत होता.... कुठेतरी दूरवरून कुत्र्याचा बेसूर रडण्याचा आवाज येत होता..... त्या भयाण काळोखात बाईक चा प्रकाशझोतात ते चालले होते....पण अचानक त्यांना काही दिसलं.... कोणीतरी विरुद्ध दिशेला तोंड करून बसल होत.... कोण असेल....?? आणि इथे का बसल असेल..... त्यांनी जवळ येउन बाईक थांबवली....एकाने हाक मारली.... "पाव्हण.... कोण हो तुम्ही.... काय करून राहिलासा एवढ्या रातचाला ....." त्या व्यक्तीने मन वळवली.....त्याला पाहून दोघांची बोबडीच वळली.... तो गणूदा होता.... डोक फुटलं होत.... त्यातून रक्त वाहत होत... एक हात मोडला होता... तो नुसताच लटकत होता.... सर्वात भयानक होते ते डोळे..... पांढरे फक्त पांढरे. . त्यातील काळे बुबळे गायबच होते.... चेहरा पूर्ण निर्जीव.. त्याच हे भयंकर रूप पाहून ते बाईक वरून कोसळलेच.... पण ते इतके घाबरले होते कि पळून जाण्याइतका पण त्यांच्या पायात जीव नव्हता....हातानेच स्वता:ला ते मागे सरकवत त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते..... पण गणूदा त्यांच्याकडे येत होता.. एक पाय पुढे टाकत. दुसरा पाय फरफटत आणत होता...तो त्यांच्या जवळ आला.. दोघे त्याच्या समोर गयावया करत होते... "आम्हाला जाऊ दे. . "

गणूदा कर्णकर्कश्य आवाजात बोलला.... "सोडतो तुम्हाला.....पण माझ्या एका प्रश्नाच उत्तर द्या.... त्या प्रश्नाच उत्तर मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.... " दोघे एकदमच बोलले....." क ... क..... कोणता प्रश्न....?? " गणूदा त्यांच्या एकदम जवळ गेला आणि बोलला......." कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं ....????" . .

गणूदा च्या पिंडाला अजून कावळ्याने शिवल नाही ...... .

Story By- हासीम नागराल

Friday 24 July 2015

नात माणूसकीचं

रोजचा आपल्या धावपळीत कधी कधी असे लोक
आपल्याला भेटून जातात.....ज्यां
चा आपल्या आयुष्याशी तसा काहीच संबंध नसतो....पण
जाता जाता ते अस काही बोलून जातात की ज्याने
आपल्या विचाराला किंवा आपला आयुष्या बद्दलचा पूर्ण
दृष्टीकोन बदलून
टाकतात....आणि मनाचा एका कोपर्यात कायम एक आठवण
नावच घर करून राहून जातात......
साधारण 4-5 वर्षापूर्वी मी कोल्हापूर मध्ये जॉब
करायचो....तस शिक्षणही चालूच होत....पण
शिक्षणासाठी कोणावर अवलंबून रहायच नव्हतं....रोज
सकाळी 5 ला उठणे आणि मग सायकल वरुन हातकणंगले
ला जाने....माझा घरापासून साधारण 10-12 किलोमीटर
च अंतर होत....आईपण माझा साठी सकाळी उठून
जेवणाचा डबा बनवून द्यायची.....आणि दिवसभर काम
करून संध्याकाळी 6 पर्यन्त घरी....मग राहिलेल्या वेळात
अभ्यास.....हाच रोजचा दिनक्रम होता....
रेल्वे स्टेशन चा जवळ सायकल
लावण्यासाठी जागा होती....30 रुपये महिना द्यावे
लागायचे....तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक
म्हातारी बाई बसलेली असायची......चार बांबू लावून वर
कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत
होत....त्यातच ती आजी राहायची.....अंगावर एकदम
जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली.....डोक्यावरचे केस
पूर्ण पिकलेले होते....साधारण 70-75 वय असावे....तिथे
एक जून गोणपाट होत...त्यावरच
बसलेली असायची....थंडी पासून बचावा साठी एक
काली चादर पण होती...थंडीचा दिवसात कायम अंगावर
घेतलेली ती दिसायची....समोर एक जर्मन च
ताट...आणि एक स्टीलची चेपलेली वाटी.....एवढच......एवढं
असूनही चेहर्यावर कायम स्मितहास्य असायचं......
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत
होत तेंव्हा तिने मला विचारलं...,"बाळ.....नाव काय
तुझ...??
मी बोललो..."हासीम....
कदाचित त्यांना ऐकू नाही गेल किंवा नाव समजलं
नाही....त्यांनी पुन्हा विचारलं....काय..??
मी पुन्हा बोललो..."हासीम...
त्या हसत हसत बोलल्या..."अच्छा....आसिम....छान आहे
नाव....
मनात आल त्यांची चूक दुरुस्त करावी आणि सांगावं...आसिम
नाही हासीम.......परत म्हटलं राहू दे....म्हणू दे
काहीतरी.....
त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असत..??
गाव कोणत...??
नंतर सायकलीला अडकवलेल्या माझा बॅग कडे पाहून
विचारलं....,"डब्या मध्ये काही शिल्लक आहे का...??
मी क्षणभर गोंधळलो.....मग बोललो...,"नाही ओ आजी....."
का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही बोलताना....
मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या.....,"क
ाही हरकत नाही...पण कधी काही शिल्लक राहील तर
टाकून देण्या पेक्षा आणत जा आणि मला देत जा..."
हे
सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे
डोळे ओशाळलेले वाटत होते....कदाचित त्यांना लाज
वाटत होती अस काही मागण्याची.....पण
मजबूरी होती त्यांची.....उपाशी पोट
कोणाकडूनही काहीही करवून घेत.....
मी हो बोललो आणि निघालो......
घरी आल्यानंतर रात्री आई जवळ
बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं...तिला पण खूप
वाईट वाटलं......दुसर्या दिवशी सकाळी तिने न
सांगता डब्यात 2 चपाती जास्त
भरल्या आणि बोलल्या त्या आजीला दे....मला खूप बर
वाटलं....मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज
आला....,"आता गेल्या गेल्या दे....म्हणजे आताच ताज खाऊन
घेतील...."
मी हो बोलून
निघालो....त्या आजी झोपल्या होत्या....त्यांना उठवून
चपाती आणि भाजी त्यांचा ताटात काढून दिल....
त्या आजीचा चेहर्यावर वेगळाच आनंद
होता....त्याचा चेहर्यावरील आनंद पाहून मनाला खूप
समाधान मिळालं.....
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण
आली....आणि एक चपाती काढून
ठेवली....आणि मित्रांचा पण डब्यात जे जेवण शिल्लक होत
ते माझा डब्यात भरून घेतलं.....
संध्याकाळी मी तो डबा त्यांना दिला.....मग त्या गोड
हसल्या.....त्यांनी डबा रिकामा करून दिला....
आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे
तुकडे केले....आणि थोड दूर जावून पसरून
ठेवले...आणि त्यांचा जवळचा वाटीत पानी भरून
त्या तुकड्याजवळ ठेवलं.......
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत
होतो....त्या पुन्हा जवळ येऊन
बसल्या.....मी विचारलं..."आजी काय करताय हे...??
त्या हसल्या आणि बोलल्या.....बघ तिकडे....
मी तिकडे पाहिल तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे
खाऊ लागले आणि जवळचा वाटीतील पानी पिऊ लागले....
मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून
गेली.......कदाचित
ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन
चालली होती......
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग
दिसला.....मी माझा डब्यातून काही घास
त्या आजीला दिले होते....आणि त्या आजीने
तिचा घासातील काही घास
त्या चिमण्यांना दिला.....आणि त्या चिमण्यांनी पण
काही भाग तिचा पिल्लांसाठी नेला.....कदाचित हेच
जीवन होत....दुसर्यासाठी थोडसं सुख घेवून जाने.....
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहील....नंतर माझ
शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब
साठी..
चांगला जॉब मिळाला तेंव्हा आवर्जून
त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो....त्यांनी
पेढा घेतला....अर्धा मला भरवला आणि डोळ्यात
पानी आणून बोलल्या....''आठवणीने मला पेढा दिलास
यातच समाधान आहे.....माझा पोटचा पोराने
मला महालक्ष्मी देवीचा दर्शनासाठी आणल
आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला....पण कोण
कुठला तू ...मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान
वाटलं....खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू..."
मी त्यांचा पाया पडून आशीर्वाद
घेतला आणि निघालो......तेंव्हा एक गोष्ट लक्षात
आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवण खूप सोप
आहे....म्हणजे एखाद्याला आपण आनंद
दिला की त्या बदल्यात आपल्याला.....समाधान,आनंद
आणि आशीर्वाद मिळून जात.....पण आयुष्य संपलं तरी आपण
हे दुसरीकडे शोधत बसतो....
मध्ये वर्ष निघून गेल...जॉब आता पर्मनंट
झाला होता.....म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो....पण
त्या तिथे नव्हत्या....त्यांचं साहित्य पण नव्हतं
तिथे....फक्त दूर नेहमीचा जागेवर ती वाटी होती.....
मी जवळचा टपरीवर गेलो आणि विचारलं..."इथल्
या आजी कुठे आहेत...??"
त्याने मला पहिलं आणि बोलला..."अरे वारल्या त्या...2
महीने होवून गेले...
ऐकून खूप वाईट वाटलं....मन सुन्न झालं....
जणू कोणीतरी जवळच गेल होत....
मी त्या वाटीकडे
पहिलं...कोरडी पडली होती...मी माझाजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने
भरली....आणि त्यांचा साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच.....आणि निघालो तिथून....
चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक
कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.....
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायच
की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली....त्या कावळ्याला पाहून
वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला.......!!!!!!

Thursday 23 July 2015

जय हनुमान

आज थोडा हटके किस्सा . जास्त मोठा नाहीये .... बघा पटतो का ???
हसीम आज एक अद्भुत किस्सा आपल्या सोबत Share करतोय .
महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बोर्डर वर भैरापूर नावाच एक छोटेसे गाव आहे . साधारण २ हजार लोकवस्ती असलेल . आर्यन पाटील या माझ्या मित्राचे ते गाव .
मी त्याच्यासोबत भैरापूर ला गेलो होतो .
तिथे मी त्याच्या काकूला भेटलो . वय साधारण ४० - ४५ असेल .
अस म्हणतात कि त्यांच्या अंगात देव येतो. आणि त्या वेळी त्या जे बोलतात ते सगळ खर होत .
मी त्या काकुशी मस्त गप्पा मारत होतो . तेव्हा त्यांनी ,त्यांना येउन गेलेला एक दैवी अनुभव मला सांगितला .
साधारण ३ वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल .
त्या रानामध्ये गवत काढायचे काम करत होत्या .
अचानक समोर २००-३०० मीटर अंतरावर त्यांना एक माकडा सारखा विचित्र प्राणी दिसला ,
चांगलाच १२-१३ फूट उंच होता .
पूर्ण अंगावर लांब केस होते , मागे लांबलचक शेपूट , पूर्ण केसाळ प्राणी होता ,वाकून वाकून चालत होता .
काकूंनी त्याला बघितल आणि जोरात बाकीच्या बायकांना ओरडून सांगू लागल्या .
"अरे तो बघा काय आहे ? "
सर्व बायका काम सोडून तिकडे बघू लागले पण कोणालाच काही दिसेना .
" काय ग ? कुठे काय ? " त्या बायका बोलल्या .
" अग तो बघ न केवढ मोठ माकड आहे ." काकूंनी त्यांना सांगितल .
पण कोणालाच काही दिसत नव्हत .
तेवढ्यात त्या माकडाने जोरात उडी मारली . आणि जवळच एक मोठ झाड होत त्या झाडावर ते बसल.
तश्या काकू ओरडल्या "हे बघ ..कसली उडी मारली त्याने "
ते माकड कोणाला दिसलं नाही पण झाड खूप जोरजोरात हलत होत . ते मात्र सर्वांनी पाहिलं .
आता सर्वांना पटल कि तिथे काहीतरी आहे जे फक्त काकूंना दिसत आहे .
तेवढ्यात त्या मोठ्या माकडाने पुन्हा आकाशाकडे झेप घेतली आणि तसाच वर वर गेला आणि दिसेनासा झाला .
काकूंना दिसलेलं ते मोठ माकड दुसर तिसर कोणी नसून राम भक्त हनुमान म्हणजेच आपला मारुती राया होता .
अजूनही त्या गावातील सगळेजण काकूंना स्वतः मारुतीरायाने येउन दर्शन दिल आहे असच समजतात .

Monday 20 July 2015

झलक

****Hasim****
मी १० वीत असतानाचा हा किस्सा . त्यावेळी अक्सर चित्रपटातल " झलक दिखलाजा " हे गाण खूप famous झाल होत .
एके दिवशी मी ' आज तक 'news channel वर पाहिलं होत की "गुजरात मध्ये एक गाव आहे . त्या गावात झलक दिखलाजा song लावलं का भूत येतात . "
हे ऐकून मी एक plan बनवला. रात्री स्मशानात बसून जागायचं आणि ते गाण म्हणायचं "झलक दिखलाजा .
मी मनाशीच म्हंटल "बघू तरी कशी भूत येतात ????
मी हा plan माझा एक खास मित्र ' अभी ' ला सांगितला . तो plan ऐकून यायला तयार झाला .
३ दिवसांनी अमावस्या होती त्याच दिवशी जायचं ठरलं ……
ठरल्या दिवशी मी घरी सांगितल की "मी अभी कडे झोपायला चाललोय …. ", अभी ने त्याच्या घरी सांगितल की मि "हसीम कडे झोपायला जातोय … "
बरोबर १०:३० वाजता आम्ही भेटलो आणि चालत चालत स्मशानाकडे निघालो . आम्ही खुप आतुर झालो होतो . जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक oil paint चा डब्बा दिसला .
मी तो डब्बा स्मशानात वाजवायला घेतला . music पण हव ना गाण्या बरोबर म्हणून ….
स्मशानात पोहोचलो. स्मशानामध्ये एक पत्रा टाकून बनवलेली shade होती …. त्या मध्ये कट्टा होता जिथे मेलेल्या माणसाला जाळतात …… आम्ही त्यावर जाऊन बसलो ...
अभी ने तो oil paint चा डब्बा वाजवायला सुरवात केली , मग मी पण हिमेश प्रमाणे ' oooooouuuuuu huujooooorrrrrrrrr ' पासून सुरवात केली .
मग आम्ही दोघ मिळून ओरडायला लागलो "झलक दिखलाजा ,झलक दिखलाजा , एक बर आजा आजा आsssssssss जाsss "
तेवढ्यात जवळच्या एका झुडूपामधुन एक बाई किंकाळत किंकाळत बाहेर आली . आणि तशीच किंकाळी फोडत शिंदे वस्ती कडे पाळली …….
अंधार असल्यामुळे आम्हाला काही स्पष्ट नाही दिसलं . पण हे बघून आमच्या दोघे चांगलेच घाबरलो . तो डबडा दिला टाकून आणि लागलो न दोघ पाळायला . पळत - पळतच गावात परत आलो . आणि सरळ मारुती मंदिरात घुसलो .
अभी बोलायला लागला "बघ होत कि नाही भूत .. बघ होत कि नाही भूत ???".
माझी तर चांगलीच फाटली होती . मी तर काही बोलायच्याहि शुद्धीत नव्हतो .
परत कधी भुत पहायचं नाही अस ठरवून आम्ही मारुतीच्या मंदिरातच झोपलो .
सकाळी उठुन घरी आलो . घरी कोणाला काहीही माहित नव्हत . आम्ही दोघांनीही आमच्या घरी काही एक सांगितल नाही .
३-४ दिवसांनी शिंदे वस्तीतल्या काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला सांगू लागल्या
" तेरे को काय सांगू हसीम की आई ……
परवा रात को मै toilet के लिये स्मशान के पास गयी . तब दोन भूत वहा डबडा बजा रहे थे और गा रहे थे 'एक बार आजा आजा आजा '. मै कसल्या घाबरी क्या सांगू तेरेको अब ???
मै तो बाई तिथच चिम्पाट फ़ेकके भागी ना …"

Sunday 19 July 2015

कोण होती ती....???

“अहो डॉक्टर साहेब, या ICU रूमची वास्तू चुकलीये....” नाना खूप कासाविस होऊन डॉक्टरांना समजावत होते...
यावर डॉक्टर हसले आणि बोलले, “अहो नाना, वय झालय आता तुमचे... जुने विचार सोडून द्या... हॉस्पिटलला कुठली आलीये वास्तू.....”
यावर नाना बोलले, “अहो डॉक्टर साहेब, मी या हॉस्पिटलमध्ये येऊन ६ महिने झाले... या ६ महिन्यात कालचा रुग्ण पकडून ६ रुग्णांचा मृत्यू झालाय... ते पण ऑपरेशन यशस्वी होऊन सुद्धा...
डॉक्टर बोलले, “नाना, होत असं कधी कधी... देवाची साथ नाही मिळत... आपण आपला प्रयत्न करायचा... बाकी सर्व त्या परमेश्वराच्या हातात....”
नाना त्यांचे घारे डोळे आणखी मोठे करून बोलले, “काही गोष्टी फक्त परमेश्वराच्या नाही तर भुतांच्या पण हातात असतात.... नाहीतर फक्त अमावास्येला ते पण बरोबर १२ वाजता लोक मेले नसते...” इतके बोलून नाना तिथून निघून गेले;
पण डॉक्टर तिथेच शून्यात नजर लावून विचार करू लागले.... नानांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे... ६ रुग्णांचा मृत्यू... ते पण अमावस्येला... बरोबर १२ च्या सुमारास... हा योगायोग नक्कीच नाही...

नाना किती विचित्र माणूस होता... हॉस्पिटलच्या साफसफाई चे काम त्याच्याकडे होते... तो कधीच सुट्टी घ्यायचा नाही... पण अमावस्येला न चुकता कुठे तरी जायचा... कुठे??? कोणालाच माहिती नाही... त्याची बायको गंगू... ती पण तशीच विचित्र... नानाच्या जागी महिन्यातून एकदा कामावर यायची... अमावस्येला नाना नसायचा तेवा ती साफसफाई करायची.... दोघांचेही वय झाले होते... पण मुल-बाळ नव्हते... लोक असे पण बोलायचे कि हे जोडपे मुल होण्यासाठी काळी जादू पण करते...

इकडे डॉक्टरांना काय करावे सुचत नव्हते... या साऱ्या प्रकरणात हॉस्पिटलची खूप बदनामी होत होती...
लोकांना पण असे वाटत होते कि हॉस्पिटलला भुताने पछाडलेय... काही रुग्णांना अमावस्येच्या दिवशी एक बाई देखील दिसली होती हॉस्पिटलमध्ये फिरणारी... रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती या सर्वामुळे... आता काही ठोस पावले उचलण्याची वेळ आली होती..

. मग डॉक्टर पोलिस स्टेशनला गेले... त्यांनी पूर्ण परिस्थिति पोलिसांना सांगितली... पोलिस आणि डॉक्टर यांनी मिळून एक योजना आखली... त्यांनी अमेरिकेवरून paranormal experts चे एक पथक बोलवले... त्यांचे 5 experts चे पथक पुढच्या काही दिवसातच दाखल झाले... त्या experts नी मग हॉस्पिटल चा ताबा घेतला... एक योजना बनवली... त्यानंतर त्यांनी पूर्ण हॉस्पिटल मध्ये CCTV camera लावून ठेवले.... खास करून त्या ICU रूम मध्ये, जिथे लोक मरत होते... काहीही करून त्यांना आणखी बळी द्यायचे नव्हते...

अमावस्येची ती काळरात्र आली.... आणि मग सर्वांचे डोळे वाट पाहू लागले.... डॉक्टर, पोलिस, आणि अमेरिकेचे paranormal experts.... एका रूम मध्ये बसून CCTV footage पाहू लागले... सर्वांचे लक्ष स्क्रीन आणि घड्याळ यावरच होते... काटा हळु हळु १२ कड़े सरकत होता... त्या रूम मध्ये इतके सारे लोक होते पण तरीही स्मशानशांतता होती...
इतकी की अगदी सेकंड काट्याची टिक टिक देखिल हृदयाचा ठोका चुकवत होती...बारा वाजायला काहीच मिनिटे बाकी होती...
इतक्यात स्क्रीनवर एक सावली दिसली... त्या सावलीने हॉस्पिटलमधे प्रवेश केला... सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले... CCTV camera मधून त्यांना ती सावली पाठमोरी दिसत होती...

एक बाई होती ती... नक्कीच आत्मा असणार अशी खात्री झाली सर्वांची... पण चेहरा दिसत नव्हता... कारण camera मागे होता....
त्या बाईने ICU रूम मध्ये प्रवेश केला... AC रूम असून पण सर्वांना घाम फुटला होता...
श्वास रोखून सर्वजण त्या बाई ची हालचाल पाहत होते... मग ती बाई... लाइट च्या स्विच जवळ गेली... आणि लाइट लावली... डॉक्टरला धक्काच बसला...
कारण ती गंगू होती... नानांची बायको... आज अमावस्या होती त्यामुळे नानांच्या जागी कामावर आली होती... मग तिने लगेच बाजुच्या ventilator ची पिन काढली...
आणि त्या जागी स्वतःचा चायना फोन चार्जिंगला लावला.......
आणि बघता बघता त्या रूम मधील सातव्या रुग्णाने जीव सोडला.....
हासिम

Wednesday 15 July 2015

 

आज ऑफिसमधून लवकरच घरी निघालो होतो , आज लोकल मध्ये एवढी गर्दी न्हवती त्यामुळे आरामात बसायला जागा मिळाली . म्हणून मस्तपैकी बसून घेतलं , आणि असाच इकडे-तिकडे आपलं बघता होतो तेवढ्यात समोर लक्ष गेलं ,माझ्या समोरच एक मुलगी शांतपणे डोळे मिटून बसली होति. का कुणास ठाऊक पण तिचा चेहरा जर ओळखीचाच वाटला , जर डोक्याला जोर देऊन विचार करू लागलो,"कोण हि?, कुठे पाहिलंय हिला", तोच टयूब पेटली "हा !! निलु… निलांबरी!!"
" हो तिच ती" आणि आठवला तो दिवस ज्या दिवशी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं . white ड्रेस मध्ये काय सुंदर दिसत होती ती म्हणजे तशी आजही तितकीच सुंदर दिसतेय , ३ वर्ष एकाच वर्गात होतो पण …. तिला फक्त पाहण्याशिवाय काहीच केलं नाही , पण तिनेही कधी मला त्या नजरेने पहिलंच नाही……
मग का पहायची????? ……. याच उत्तर शोधता शोधता ३ वर्ष निघून गेली ,कधी कळलंच नाही . मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगणं कधी जमलंच नाही….कॉलेजच्या सेंडऑफ मध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं नंतर कॉलेज संपल जॉबला लागलो . त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला .
लग्न झालय हे सांगायला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राच licencech पुरेसं होतं .
पण आता ती ओळखत असेल का मला ? कि सरलेल्या दिवसांसारखी मलाही विसरून गेली असेल?? असाही प्रश्न मनात येउन गेला पण आजही तिच्याशी बोलायची हिम्मत होत न्हवती . असे विचार मनात चालूच होते कि अचानक तिने डोळे उघडले,…. आणि आश्चर्याने ओरडतच म्हणाली ,"…. अरे नितीन तू?…. किती दिवसांनी भेटतोय आपण …. कसा आहेस?…. काय करतोस काय आजकाल?"
कायम अबोल वाटणारी मुलगी आज एका दमात एवढे सगळे प्रश्न विचारतेय हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं , हळू हळू मी जरा मोकळेपणाने बोलू लागलो , खूप गप्पा मारल्या
ती म्हणाली ," काय रे तू नितीन!! कॉलेजच्या दिवसात तू जसा होता अजूनही तसाच आहेस बघ …. घाबरट !!!" आणि हसली . पण तिच्या नजरेत मी कसा का असेना पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं . मुंबई मध्ये काही दिवसांसाठी आली होती ती, मग तिच्याकडूनच कळलं कि नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे .
ऐकून खूप बरं वाटलं , मनात विचार आला आपण काय देऊ शकणार होतो हिला हेच मुंबईतलं धकाधकीच जीवन!!! आता ती खरच किती सुखी आहे .
मग पुढे तिचा stop आला आणि … निरोप घेऊन ती निघाली … दोन पावलं चालून पुढे गेली आणि अचानक तिने मागे वळून पाहिलं ,तिच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली," खूप प्रेम करायचास ना माझ्यावर ?… मला पण तू खूप आवडायचास!! … ३ वर्ष …. रोज वाटायचं कि किमान आज तरी तू मला विचारशील म्हणून ? पण तू कायम घाबरतच राहिलास “. मग तिने डोळे पुसले आणि लोकल मधून उतरून निघून गेली पण आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते
मनात आलं त्याचवेळी थोडा धीर केला असता तर आज ……

खूप वेळा असं होतं ना की तिला बोलायचं काही धीरच होत नाही हि पोस्ट नक्की शेअर करा कदाचित हे वाचून तरी कुणी धीर करून मनातील बोलेल.

Tuesday 14 July 2015

प्रॉमिस

मॅक आणि सुहानी दोघे क्लासमेट होते . सुहानी तशी मुलाची मुंबईची होती आणि तिचे वडीलही एक मोठे बिझिनेसमन होते. सुहानीच्या हट्टामुळे तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते, मॅक…. हा तिथला सुहानीचा ऑस्ट्रेलिअन मित्र , त्याचा लूकही एकंदरीत टिपिकल ऑस्ट्रेलिअन… गोरा रंग , निळसर डोळे, आणि त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता, 1ST ईयर पासूनच दोघांची चागलीच गट्टी जमली होती. बघता बघता ४ वर्ष कशी निघुल गेली कळलच नाही, आता सुहानीच शिक्षण पूर्ण झालं होत आणि आता ती पुन्हा भारतात येणार होती , ती येण्याची सगळी तयारी करत होती इतक्यात तिला मॅक भेटला मग दोघेही कॉफीशॉपमध्ये गेले .
मग गप्पा मारता मारता मॅक सुहानीला म्हणाला," तू तर आता निघून जाणार इंडिया मध्ये …. मग पुन्हा कधी भेटणार ?? "
सुहानी ," जेव्हा तू भारतात येशील !!!"
मॅक," मला पण खूप इच्छा आहे भारतात यायची …. पण मी भारतात येईन तेव्हा तू भेटशील का मला ?"
सुहानी," अरे तुला फक्त भेटणार नाहीतर पूर्ण भारत दाखवणार आहे"
मॅक,"खरच…??… प्रॉमिस ??"
सुहानी ," हो रे प्रॉमिस नक्की "
मग सुहानी भारतात निघून आली , आणि तिकडे मॅकहि आपल्या नोकरीत बिझी झाला . तरीही दोघांची मैत्री मात्र अतूट राहिली . पुढे काही वर्षांनंतर मॅकला त्याच्या कंपनीतर्फे भारतात येण्याची संधी मिळाली. मॅकला लगेच सुहानीची आठवण झाली त्याला तर खूपच आनंद झाला, पण कॉलेज संपल्यापासून दोघांमध्ये कसलाच कॉन्टॅक्ट राहिला न्हवता तरीही कसल्याश्या आशेवर तो भारतात आला आणि योगायोगाने त्याच मुंबईतच काम होतं. सगळी कामं संपवून तो आपल्या रूम वर आला , त्याला पूर्ण भारत फिरायची इच्छा होती पण सुहानिशी त्याचा कसलाच कॉन्टॅक्ट होत न्हवता त्यामुळे तो हिरमुसला आणि नाराज होऊन एका गार्डन मध्ये जाऊन बसला ," शिट यार … कसला प्रॉमिस हिचा म्हणे कधीही ये … तुला पूर्ण भारत फिरवते " मॅक स्व:ताशीच बडबडत होता.
इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवल्याचे त्याला जाणवले आणि त्याने पटकन मागे वळून पाहिले तर ती सुहानी होती, किती सुंदर दिसत होती, ती अगदी कॉलेजमध्ये होती तशी तिला पाहताच मॅकला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले होते
मॅक," तू!! कशी आहेस सुहानी … आणि तुला कसं कळलं मी इथे आलोय ते ….आणि तुझा मोबईल का बंद येतोय??"
सुहानी ," अरे हो थांब जरा किती प्रश्न विचारशील एकदमच … अरे भारतात आल्यावर मोबईल नंबर चेंज केला मी आणि आता शोपिंगला चालले होते तर तू दिसलास इथे या गार्डन मध्ये.... "
मॅक," हम्म... मग प्रॉमिस लक्षात आहे ना "
सुहानी ,"हो तर …. त्यासाठीच तर आलेय न इथे मी … चाल जाऊ फिरायला आणि हो आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. " एवढं बोलू ती नेहमीप्रमाणे गोड हसली .
मग २ दिवस ते दोघेही खूप फिरले, खरेदी केली केली
मॅकला आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला परत जायचं होतं . जाताना शेवटची कॉफी म्हणून दोघांनी एकत्र घ्याची ठरवलं आणि दोघेही एक कॉफी शोप मध्ये गेले.
मॅक,"थॅंक यू सो मच यार सुहानी … तुझ्यामुळे हे २ दिवस खूपचं आणि मजेत गेले "
सुहानी," अरे मग… प्रोमीस केलं होतं न तुला … कसं तोडणार "
मॅक,"बंर भारतीय नारी … मला एक सांग कालपासून मी पाहतोय सर्व लोक माझ्याकडे पाहून हसतायत आणि एकटक पाहत का होते ?"
सुहानी ," अरे तू फॉरेनर आहेस न म्हणून पाहत असतील ते , मला नाही का ऑस्ट्रेलियात लोक पाहायचे अगदी तसेच"
मॅक,"अरे हो …. असेल कदाचित "
सुहानी ," माझ्याकडून तुला हे गिफ्ट फ्लाईट मध्ये बसल्यावरच उघड आता नको " आणि तिने एक लिफाफा त्याच्या हातात दिला "
मॅक," ठीक आहे … पुन्हा नक्की भेटू बाय "
मग मॅक आपल्या फ्लाईट मध्ये जाऊन बसला आणि सुहानीचा निरोप घेतला त्यावेळी विमानतळावरची माणसे मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती मग प्लेनने टेकऑफ केलं.
मग मॅकने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि एक एक करून सर्व फोटो पाहू लागला मस्त फोटो आले होते सगळे पण अचानक काही फोटोज पाहून तो दचकला
कारण त्या फोटोत तो एकटाच होता सुहानी त्यात कुठेच दिसत न्हवती
तो खूप घाबरला आता त्याला आठवले कि लोक त्याला का एकटक पाहून का हसत होते, ते कदाचित तो एकटाच बडबडत होता म्हणून, म्हणजे २ दिवस सुहानी फक्त त्याला एकट्यालाच दिसत होती ??? कस शक्य आहे हे " त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले...... मग एकाएकी त्याला सुहानीने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली त्याने पटकन तो आपल्या बागेतून त्याने तो लिफाफा काढून उघडला …. त्यात एक चिट्ठी होती …. मॅक ती चिट्ठी वाचू लागला त्या लिहीलं होतं
" डीअर मॅक ,
ज्या दिवशी मी ऑस्ट्रेलियाहून भारतात निघाले त्याच दिवशी माझे प्लेन क्रॅश झाले … त्याचवेळी मी हे जग सोडून गेले होते , पण या जगात पुन्हा आले होते ते तुला दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी … काय करणार भारतीय आहे न मी
युअर्स लेट सुहानी "
ती चिट्ठी वाचून जितका मोठा धक्का मॅकला बसला होता तितकच जास्त दुखं त्याला सुहानीच्या अश्या प्रकारे जाण्याचं झालं होतं . मॅकचे डोळे पाणावले होते आणि त्या चिट्ठीतल्या अक्षरांवर त्याचे अश्रू ओघळले, आता त्याला सुहानीचे ते शब्द आठवू लागले
"आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. "

Monday 13 July 2015






’अग मी येणार आहे लवकरच,काही खास नाही ग असाच चाललोय काकांना भेटायला’’, रोहन पुजाला सांगत होता,,
‘’ठिकय पण आला की सर्वात आधी माला फोन करून भेटायला यायच’’,पुजा हक्काने बोलली
‘’हो ग,नक्की येईन’’, रोहन हसत बोलला.
पुजा आणि रोहन लहानपना पासूनचे मित्र,रोहनला पुजा खूप आवडायची अगदी लहानपणा पासून तो तीचावर प्रेम करायचा पण पुजाला सांगायच धाडस कधी त्याचाकडून झालाच नाही,मग शेवटी व्हायचं तेच झाल.. एक दिवस पुजा त्याचाकडे पळत पळत आली आणि बोलली…..’’रोहन मी खूप खुश आहे आज मला सुभाषने प्रपोज केल,मी पण त्याला हो बोलले,मी काही‘ चुकीच नाही ना केल...??
रोहनला काय बोलाव ते सुचेना तोंडावर नकली हसू आणत तो बोलला...’’अरे वा अभिनंदन खूप चांगला मुलगा आहे तो’’
त्या दिवशी घरी जाऊन एकांतात खूप रडला तो,पण त्याला पुजाचा आनंदी चेहरा आठवला किती खूश होती ती सुभाष सोबत आणि मग त्याला स्वत:चाच राग आला,कसला प्रेम आहे माझ जे पुजाला आनंदी पाहून अश्रु वाहवत बसलोय, दिवसामागून दिवस जात होते आणि सुभाष आणि पूजातर प्रेमात पूर्ण बुडाले होते..रोहन काही दिवसांसाठी दिल्लीला चालला होता त्याने पुजाचा फोनवरच निरोप घेतला,दिल्लीमधे त्याचे काका होते,खूप मोठे डॉक्टर होते ते,बघता बघता सहा महीने होवून गेले,रोहनला पुजाची खूप आठवण यायची पण त्याने तिला जाणीवपूर्वक तिच्याशी बोलणं टाळल होत...सहा महिन्या नंतर तो परत आला...रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या त्याने पूजला फोन केला परंतु तिचा फोन बंद होता,मग रोहन घरी गेला थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागली...थोडा आराम करून मग तो उठला आणि पुन्हा पुजाला फोन केला पण अजूनही फोन बंदच होता,मग त्याने सुभाषला फोन केला,
‘’बोल रोहन,कधी आलास पुण्यात’’...सुभाष बोलला
‘’अरे सकाळीच आलो,पण मला सांग पुजा कुठे आहे आणि फोन का बंद आहे तिचा...?? रोहनने सरल मुद्द्यावर आला ..
‘’हे बघ रोहन मला तिचा बद्दल काही बोलायचं नाही मागचा चार महिन्या पासून मी बोललो नाही तिच्याशी” सुभाष त्रासिक आवाजात बोलला
‘’अरे का काय झाल.भांडण झाल का तुमच..तुम्ही तर किती प्रेम करायचा....?? रोहनला काही काळात नव्हतं
“रोहन तुला बोललो ना मला काही बोलायच नाही पुजाबद्दल”सुभाष चिडून बोलला
“अरे पण झाल तरी काय”
“बलात्कार झालाय तीचावर....सुभाष ओरडून बोलला आणि फोन कट करून टाकला रोहनचा तर पायाखालची जमीन सरकली हे ऐकून...तो जागेवरच बसला..रोज तो बातमी ऐकायचं पेपर मधे वाचायचा बलात्कार बद्दल पण आपल्या एका जवळचा व्यक्तिसोबत अस काही घडलं अस त्याने कधी विचार केला नव्हता..तो लगेच तेथून उठला आणि सरळ पुजाच्या घरी गेला,त्याने बेल वाजवली पुजाच्या आईने दरवाजा उघडला,
“ये ना रोहन किती दिवसानी आला आहेस”पुजाचा आईने त्याच स्वागत केल..रोहनला चहा बनवून दिला.. रोहन इकडे तिकडे पाहून बोलला..’’पुजाबद्दल समजल मला” एवढं ऐकून पुजाची आई रडू लागली आणि बोलली..”रोहन बघ ना रे काय झाल माझा पिल्लासोबत लोकल मधून येत होती रे रात्रीची चार नराधमांनी तिला घेरल आणि तिची अब्रू लुटली रे”
रोहन बोलला..”कुठे आहे ती” “रूममधे बंद असते आणि आता तर नवीनच खूळ भरलय तिचा डोक्यात”पुजाची आई डोळे पुसत बोलली तिला त्या घटनेमुळे दिवस गेलेत” रोहनला तर एकामागून एक धक्के बसत होते.. आईपुढे बोलली...”तिला गर्भपात करायला सांगितलं तर तयार पण नाही तूच समजून सांग आता तिला,समोरचा रूम मधे आहे ती..” रोहन उठला आणि हळूच रूम मधे गेला,पुजा कोणततरी पुस्तक वाचत होती,केस मागे बांधलेले,चेहर्याावरच तेज तर नाहीस झाल होत...
“पुजा”......रोहनने हलक्या आवाजात हाक मारली पुजाने रोहनला पहिलं आणि खूप खुश झाली,दोघे बोलत बसले थोडा वेळ बोलल्या नंतर रोहन बोलला..”तुझासोबत जे घडलं ते कळलं मला खूप वाईट वाटलं ऐकून” पुजा बनावट हसत बोलली..”अच्छा तर तू मला सात्वन द्यायला आला आहेस तर...
“नाही ग...पुजा पन मला अस वाटत की तु गर्भपात करून कुठेतरी लग्न करावस”रोहनला तिची काळजी होती.. पुजा बोलली..”हे बघ रोहन जे घडलं त्यात माझा पोटातील जीवाचा काय दोष होता,त्या राक्षसानी जे केल त्याची शिक्षा मी या छोट्या जीवाला नाही देऊ शकत”
“अग मग लग्न कर ना,लग्न करायला काय हरकत आहे..??रोहन बोलला आता मात्र पुजाला रोहणची कीव आली आणि बोलली..”कोण करणार माझाशी लग्न,त्या घटने नंतर तर सुभाषने मला एकदापन फोन नाही केला,मी प्रयत्न केला तर त्याने सरळ सरळ पुन्हा फोन करू नको म्हणून बजावल” पुजाचा डोळ्यातून पाणी आल..
“अग पण सुभाषच का...? दुसर कोणीतरी नक्की लग्न करेल तुझाशी” रोहन बोलला
“तू करशील माझाशी लग्न..?? पुजाने विचारलं असल्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला
आणि बोलला..”नाही,ते शक्य नाही..” पुजा हसली आणि बोलली,”हेच मी तुला सांगतेय,बोलणं खूप सोप असत आणि कारण तेवढच अवघड,एखाद्या मुलीच मार्तुत्व स्वीकारायला पुरषार्थ लागतो..
” रोहण उठला आणि खिडकीतून उगाचच बाहेर बघत बोलला...”तुझ मार्तुत्व स्वीकारायच पुरुषार्थ आहे माझात” रोहन वळला आणि पुजाकडे पाहत बोलला...”पण तुला मार्तुत्व देण्याचा पुरषार्थ नाही माझात” पुजाला उठून उभी राहिली आणि बोलली,”म्हणजे...???”
रोहन बोलला...”मी कधी बाप बनू शकत नाही…..” पुजाला हे ऐकून खूप धक्का बसला
रोहन पुढे बोलला...”दिल्ली मध्ये काकांकडे गेलो होतो,ते डॉक्टर आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पूर्ण चेकअप त्याच रिपोर्ट मध्ये हे सिद्ध झाल,तू बोल आता,मी तुझा बाळाला माझ नाव द्यायला तयार आहे,पण तू तयार आहेस का अशा माणसाचं नाव लावून घ्यायला जो कधीच तुला पुन्हा आई बनवू शकत नाही...”
पुजा त्याचाजवळ गेली आणि बोलली..”तू माझा स्वीकार करतोय यातच तू तुझ पुरषत्व सिद्ध केलस,मी तुला देईन आयुष्यभर साथ...” दोघांनी एकमेकांचा हातात हात दिला आणि बाहेर निघाले,एका अशा आयुष्याकडे जिथे फक्त ते दोघेच एकमेकांचा भावना समजू शकत होते
.... Story by:-****HASIM****

Saturday 11 July 2015

"समज -गैरसमज "

"समज -गैरसमज "

काही टेन्शन घेऊ नकोस रे …… मुलींना ना भांडणं करणारी आणि वाद घालणारी मुलं अजिबात आवडत नाहीत . आणि काय हि तुझी हेअरस्टाईल… जॉन अब्राहम आहेस का ?… बाजूला एक भांग पाड . " नितीन अर्जुनला ट्रेनिंग देत होता .
अर्जुन पण गपचूप शहाण्या मुलासारखं सर्व ऐकून घेत होता . कारण आज तो पहिल्यांदाच सियाला भेटायला जाणार होता…. तसं दोघांचाही लग्न आधीच ठरलेलं होतं , त्यांच्या घरच्यांनीच हे लग्न ठरवलं होतं या जमान्यात पण दोघांनी अरेंज मेरीजवर विश्वास ठेवून लग्नाला संमती दिली होती. पण तरीही एकदा ते दोघे एकमेकांना भेटणार होते
अर्जुन ऐकून होता कि 'फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन' म्हणून तो खूप तयारी करत होता . आणि तो दिवस उजाडला अर्जुन ने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट घातले होते कारण फॉर्मल हेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे अस त्याला नितीननेच सांगितलं होतं .
मग ठरलेल्या ठिकाणी तो ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिट आधीच जाऊन पोहोचला होता . मग त्याने टेबलकडे पहिला तर तिथे सिया आधीच येउन बसली होती . तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता , त्यावेळी सिया खूपच सुंदर दिसत होति. मग अर्जुन तिच्या जवळ जाऊन उभा राहिला तशी त्याला पाहून सियाही चटकन उठून उभी राहिली . आणि दोघेही गोंधळल्यामुळे दोघांच्याही तोंडून आपसूकच एकत्र शब्द निघाले ," तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात ?" मग दोघांनीही एकमेकांकडे पहिले तर सिया ने गालात हसत मान खाली घातली .
मग अर्जुन म्हणाला ," plz बसा ना " तशी सिया आपल्या जागेवर बसली आणि अर्जुननेही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून घेतलं .
आणि तिच्याकडे पाहत म्हणाला ." सगळ्या दुनियेचा हा प्रोब्लेम आहे कि त्यांचा पार्टनर लेट येतो पण आपण दोघेही ठरलेल्या वेळेच्या १ मिनिट आधीच आलो "
सिया हळूच त्याच्याकडे पाहत म्हणाली ," कदाचित भेटण्याच्या ओढीमुळे लवकर आलो आपण "
मग तशी सिया खूप लाजाळू स्वभावाची मुलगी होती , पण अर्जुनाशी थोडा वेळ बोलल्यानंतर ती थोडी कम्फर्टेबल झाली आणि मग छानपैकी दोघांच्या गप्पा सुरु झाल्या . पण तरीही ती मोजकाच बोलत होती .
थोडा वेळ आच झाला असेल मग तिथे चार टपोरी मुलांचा घोळका हॉटेलमध्ये शिरला आणि सिया व अर्जुनच्या मागच्याच टेबलावर जाऊन ते चौघे बसले . खूप मोठमोठ्याने त्यांची थट्टामस्करी चालू होती व मोठमोठ्याने ते हसत होते . आणि त्याचं बोलानही खूपच असभ्य होतं . त्यांच्या तिथे येण्याने क्षणात सारे वातावरण तंग झाले . इतक्यात त्यांच्यातल्या एकाचे लक्ष सिया व अर्जुनकडे गेले आणि त्याने बाकीच्या तिघानाही खुणावले . आणि त्या दोघांना पाहून तो मोठ्याने ओरडला ." अरे वो देखो लंगूर के मुं मी अंगूर " आणि ते सगळे मोठमोठ्याने हसू लागले .

मग सियाने अर्जुनकडे पाहिलं तास अर्जुन तिला म्हणाला ," जाऊ दे तू नको लक्ष देउस तिकडे , ते असेच वागणार, आपण इग्नोर करायचं त्यांना "
मग ते चौघे उठून त्यांच्या टेबलजवळ येउन उभे राहिले आणि त्यातल्या एकाने अर्जुनाची केसं विस्कटली . आणि म्हणाला ," नाव काय रे तुझं ? हा " "अर्जुन !!" अर्जुन शांतपणे म्हणाला.
त्याच नाव ऐकून ते चौघे पुन्हा मोठ्याने हसू लागले , आणि त्यातला एकजण पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला ," अर्जुन का? मग हि कोण द्रौपदी … मग आम्ही चौघे आणि एक तू …. आणि हि झाली ना आपल्या पाच पांडवांची द्रौपदी " आणि तितक्याच निर्लज्जपणे तो हसू लागला .
त्यांच्या तोंडातून अतिशयघाण असा दारूचा वास येत होता. सिया लगेच ताडकन तिथून उठली आणि ती हॉटेलच्या बाहेर पडली मग अर्जुनही लगेच तिच्या मागोमाग बाहेर निघाला .

मग ती बाहेर आली मग तिला थांबवत अर्जुन तिला म्हणाला ," अस असा होताच असत ग , आपण कधी वाद नाही घालायचा असल्या लोकांशी , दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे , मी तर कधीच भांडत नाही , न असल्या लफड्यात कधी पडत " आणि तो सियाकडे पाहू लागला . तर सिया त्याच्याकडेच पाहत होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते , राग आणि अश्रू हे दोन्ही तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. मग ती त्याला म्हणाली ," मग मला एक संग आज जर त्या लोकांनी तुझ्या डोळ्यांसमोर माझ्याशी काही अतिप्रसंग केला असता तर तरी तूम्ही असच बघत उभे राहिले असतात का? , मला असा मुलगा माझा लाईफ पार्टनर म्हणून नकोय जो माझी रक्षाच करू शकत नाही " मग तिने एका रिक्षाला हात केला आणि त्या रिक्षात बसून निघून गेली. हे सगळ ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटले त्याला आता नितीनचा खूप राग आला होता आणि त्याहीपेक्षा जास्त राग त्य टारगट मुलांचा राग आला होता . मग रागाने त्याने शर्टाचे दोन्ही बाह्य कोपरापर्यंत मागे सरल्या आणि त्वेषाने पुन्हा आत हॉटेलमध्ये निघून गेला ते चौघे अजूनही तिथेच बसून टवाळकी करत होते . अर्जुन तडक त्यांच्या टेबल कडे गेला आणि जवळच्याच एका टेबलवरची एक कोल्ड्रिंकची बाटली आणि एका मुलाच्या डोक्यावर जोरात फोडली …. त्याला असा रागात पाहून बाकीच्या तिघांनी तिथून धूम ठोकली …. आणि तो मुलगा रक्तबंबाळ होऊन तिथेच खाली पडला . मग अर्जुन तिथून निघण्यासाठी मागे वळला तर समोर सिया डोळे मोठे करून आ वासून त्याच्याकडे पाहत होती . मग अर्जुन तिच्याजवळ आला आणि आश्चर्याने तिला म्हणाला ," तू इथे का आलीस परत ?" मग सिया घाबरत त्याला म्हणाली ," इथे माझी पर्स राहिली होती म्हणून आले परत !!" मग तिने टेबलवरची आपली पर्स उचलली , तेवढ्यात अर्जुन तिला म्हणाला ," चल तुला बाईक वरून घरी सोडतो ?"
तेव्हा सिया कोणाला तरी फोन लावत होती .
अर्जुन म्हणाला ," कुणाला फोन लावतेस ?"
सिया अजूनही थोडी डिस्टर्ब च होती ती म्हणाली , अ अं… अम्बुलन्सला फोन लावला होता मी !!
मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसला आणि तिला आपला मोबिले दाखवला तर त्यानेहि अम्बुलन्सला फोन लावला होता
ते पाहून सियालाही हसू आलं . आणि म्हणाली ,"आपले विचार जुळतात हा!!"

****हसीम *****