Thursday 24 March 2016

कोंबडा

कोंबडा.....

गाव निपचीत पडलं होत.....दिवस भरचा कष्टाचा कामामुळे थकून शांत झोपले होते.... भटकी कुत्री पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेली होती....
मधेच एखाद कुत्र अचानक उठायच आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं.... त्या गावापासुन दूर.....एका वस्तीवर कोणीतरी जाग होत...
झोपडी सारखच छोट घर.... सहसा तिथे कोणी नसायच म्हणूनच ती जागा निवडली होती..... त्या अघोरी कामा साठी... आजूबाजूला भयाण शांतता...
रातकिडे मात्र त्यांचा अस्तित्वाची जाणीव करून देत होते..... वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होत....

अशा या वातावरणात ती आली....
त्या झोपडीत..... घरातील झोपल्या नंतर ती हळूच उठून आली होती..... एक भयानक कामाला सुरवात करायला... ती त्या झोपडीत आली....
शेणाने सारवलेली जमीन आणि भिंती होत्या..... तिने सोबत आणलेली मेणबत्ती पेटवली..... त्या उजेडात तिचा तो भयानक भोळा चेहरा भयानक भासू लागला...
पण त्या झोपडीत जे होते ते त्याहून पण भयानक होते..... खोली चा एका कोपर्‍यात एक कोंबडा बांधून ठेवला होता.... पाय आणि पंख बांधल्या मुले हलता
पण येत नव्हतं त्याला.... तरीपण कसाबसा गुरर.....गुरर आवाज त्याचा पोटातून निघत होता.... तिने त्या कोंबड्या कडे पहिलं आणि एक वेगळ्याच
प्रकारच हास्य तिचा चेहर्‍यावर पसरल..... तिने तिचे केस मोकळे सोडले..... झोपडीतील कळशीतील पाणी अंगावर ओतून घेतलं....
आणि सोबत आणलेल्या पांढर्‍या खडूने तिने कसलीशी आकृती काढली .... आकृती काढताना कसलेसे भयानक मंत्र पुटपुटत होती ती....
तिने चार लिंबू घेतले आणि आपला अंगठा त्यात खुपसून लिंबू फोडला आणि चार कोपर्‍यात चार लिंबू ठेवले.... मग तिने त्या कोंबड्या कडे पहिलं....
तिने त्या कोबड्या ला आकृतीचा मधोमध पकडल..... मंत्राचा वेग वाढत चालला होता,..........डोळे लाल झाले होते..... कोंबड्याचा मानेवरील
पकड घट्ट होत होती.... कोंबडा तडफडत होता.... आणि एक वेगळ्याच आवाजात किंचाळत तिने त्या कोंबड्याची मान पिरगळून टाकली.... शेवटची
झटपट करत तो कोंबडा शांत झाला.... ती ही शांत बसून राहिली..... वातावरण पण शांत भासत होत.... पण ....
पण तिने सुरू केला होता एक जीवघेणा खेळ.... ज्याला बोलतात..... करणी.........

मोबाइल ची रिंगटोन वाजत होती..... नितिन ची गाढ झोप त्यामुळे मोडली.... त्याने तसाच झोपेत फोन उचलला.....
काहीसा त्रासून....,"हॅलो...
"नितिन... अरे एक गाणगापूर च भाड हाय ... अर्जंट मदि.... जाणार हाइस का...."
वर्दी मिळाली की नितिन ची झोप उडायची.... तो बोलला..."हा जातू की.... कूट येऊ...."
"लवकर निग मग.... मी हित सांगली फाट्यावर हाय....." तिकडून आवाज आला...
"हा निघालूच चा पिऊन....." नितिन ने फोन ठेवला.... त्याने घड्याळ पहिलं रात्रीचे साडे तीन वाजले होते....
नितिन जेमतेम दहावी झालेला मुलगा.... कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून ड्रायवर म्हणून लोकांचा गाडी चालवली नंतर त्याने स्वत:ची गाडी तवेरा घेतली...
तोंडावर पाणी मारल आणि चहा घेऊन तो निघाला.... अर्ध्या तासात तो पोहचला पण....
तिथे समोरच अमोल उभा होता... ज्याने नितिन ला फोन केला होता,.... त्याचीही स्वत:ची गाडी होती.... पण ती एका बाजूने ठोकली गेलेली होती.... जवळच
पाच माणस उभी होती.... त्यातील तिघे चांगलेच दणकट होते साधारण चाळीशीतील वय.... बाकीचे दोघे पंचविशितील असतील....
नितिन ने हे पाहिल्या पाहिल्या विचारलं...,"आर काय झाल र गाडीला...."
अमोल बोलला...,"मीच  घेऊन चाललो व्हतू ह्यासनी पर गाडीचा अक्षीडंट झाला......ह्यांना जरा घाई हाय तू जा लवकर घेऊन....."
नितिन ने गाडी चालू केली..... त्याचा बाजूलाच एक जण येऊन बसला.... बाकीचे दणकट तिघे मध्ये बसले आणि एकदम मागचा स्पेस मधे नवा बसला....
नवा बाकीचा पेक्षा खूप शांत वाटत होता.....
"आर रस्सी राहिला की...." त्या तिघातील एक जण बोलला.... लगेच नितिन चा बाजूला बसलेला मोहन उठला आणि अमोल चा गाडीतील रस्सी  काढून नीतीन चा
गाडीत स्वत:चा पायाजवळ ठेवला.... रस्सी म्हटलं तरी ती एक दीड इंचाचा मजबूत दोरखंड होता....
"पाव्हण....ही आणि कशाला लागतया....." नितिन ने विचारलं.....
त्याचा या प्रश्नाने क्षणभर सर्वजण शांत झाले... पण लगेच त्यांचातील एक जण बोलला.... ,"लागलं रस्त्याला....चला तुमी....लवकर"
नितिन ला काहीच समजलं नाही.... तो आपला गाडी चालवू लागला....
पहाट होत होती....
निम्याहून अधिक अंतर त्याने कापल होत.... का कुणास ठाऊक पण त्याला गाडीतील वातावरण तंग वाटत होत.... कोणीच काही बोलत नव्हतं..... सतत सर्वांच  लक्ष
एकदम मागे बसलेल्या मुलाकड होत.....
मागचा मुलगा तर एकदम शांत बसून होता.... नितिन चा कोणत्याही प्रश्नाला मोजक्याच शब्दात उत्तर मिळत होत.... सर्व उत्तर ऐकून त्याला
एवढच कळलं होत की ते सर्वजण त्याचा जवळचा एका गावातील लोक होते ....गाव पातळीवर छोटासा व्यवसाय करायचे...एकदम मागे बसलेला मुलगा...
ज्याचं नाव नवनाथ होत.....त्याला सगळे नवा म्हणत होते.... त्याची तबियत खराब आहे आणि त्याचाच उपचारा साठी सगळे त्याला
घेऊन गाणगापूर ला चालले होते......
नितिन ला आता भूक लागली होती....
"पाव्हण..... काही खाऊन घायच का... भूक लागलीय...." नितिन बोलला...
थोडासा विचार करून त्यातील एक जण बोलला...,"घ्या मग रस्त्याचा बाजूला आणि घ्या खाऊन ....आमि भाकर्‍या आणल्याती सोबत... तुमी घ्या हाटीलात खाऊन...."
नितिनने  जवळचा हॉटेल बाहेर गाडी उभी केली.... काय विचित्र माणस आहेत याचा विचार तो करत होता.... कारण तो नाश्ता करून येई पर्यन्त सर्वजण तसेच बसून होते....
नितिन बोलला...,"माझी रातरी झोप नाय झाली.... थोडा वेळ गाडी चालवन का कोण...???"
मोहन गाडी चालवायला तयार झाला....
नितिन मागे नवा चा बाजूला बसायला जाऊ लागला......
मोहन बोलला.....,"डायवर हितच बसा की पुढ....."
"नाय नाय माग जागा हाय मी मागचं झोपतू...." नितिन बोलला बाकीचे काही बोलण्या आधी मागे जाऊन झोपला पण.....
मोहन गाडी चालवत होता....
नितिन नवा चा बाजूला बसला होता... नितिन ला गाढ झोप लागली होती.... नवा चा खांद्यावर डोक ठेवून तो झोपला होता....
अचानक त्याला कसली तरी जाणीव झाली..... नवा चा तोंडून कसलासा आवाज निघत होता....गुरर गुरर
नितिन उठला आणि त्याने नवा कडे पहिले..... तो खाली बघत काहीसा पुटपुटत होता......  अचानक त्याने नितिन कडे पहिलं....
त्याची ती नजर पाहून नितिनचा काळजात धस्स झाल..... अचानक नवा चे दोन्ही काळे बूबले गर्र्कन वर फिरले.....
कोंबड्याने बांग द्यावी तसा तो ओरडला.....
पापण्या मध्ये फक्त पंधरा भाग दिसत होता...... नवा जोरात ओरडला....
"कोंबडा आहे मी कोंबडा...... उलटा कोंबडा....."
त्याचा या अशा वागण्याने नितिन किंचाळत मधल्या सीट चा वरुण पुढे जाऊ लागला......
 मध्ये बसलेल्या लोकांनी कदाचित त्याची सवय झाली होती....
"बाजूला घे गाडी.... बाजूला घे गाडी....." कोणीतरी बोलल.....
"रस्सी घे रे लवकर.." आणखी कोणीतरी बोलल....
मोहन ने गाडी बाजूला घेतली......
मधले लोक उतरले.... रस्सी ने त्याला बांधू लागले...... शरीराने नवा खूप बारीक होता.... पण अचानक खूप ताकत आली होती त्याचा मध्ये...
दणकट लोकांना पण तो आवरत नव्हता,..... त्याच ओरडण अजूनही चालू होत....
"कोंबडा आहे मी कोंबडा..... उलटा कोंबडा..... मी करणी करणार...."
मधेच बांग दिल्या सारखं ओरडत होता....
त्या तिघांनी मिळून कसबस त्याला रस्सीने बांधलं.....
त्याचा तोंडात कापडाचा बोळा कोंबला....... आणि पुन्हा सर्वजण गाडीत बसले....
"मोहन... चल बिगि बिगि....." त्यांचा तिल एक जण बोलला....
नितिन ची तर अवस्था खूप वाईट झाली होती.... काय चाललय काहीच  कळेना....
पाण्याची पूर्ण बाटली त्याने एका श्वासात संपवली आणि बोलला....
"पावहण..... काय झालय यासणी......" नितिन बोलला....
मोहन सांगू लागला.....,"नक्की माहीत नाय..... मागचा अमावसे पासून अस करायला लागल्याती.... रातीच अचानक आरडत्यात....
करणी केल्याचा संशय हाय... म्हणून गाणगापूर ला घेऊन जातूया....."
नितिन कडे आता विचारण्या सारखं काही नव्हतं... रस्सी सोबत का घेतली ते आता त्याला कळलं होत.....
गाडीत आता शांतता होती ती गाणगापूर मध्ये पोहचे पर्यन्त.....
मंदिरात आल्या आल्या नवा शांत झाला.....
त्यांना दुसर्‍या दिवशीचा दुपारच्या आरतीला हजर रहायच होत....
नितिन ने पहिलं की मंदिराचा आवारात नवा सारखे अजून काही लोक बसले होते.... आणि सोबत त्यांचे नातेवाईक .....
दुसर्‍या दिवशी दुपारची आरती साठी सर्वजण जात होते.... मोहन नितिन ला बोलला....," डायवर.... तुमी नका येऊ... झोपा गाडीतच...."
सर्वजण आरती साठी निघून गेले..... नितिन थोडा वेळ गाडीत बसला... पण त्याने विचार केला की एवढे दूर आपण आलोय तर आरतीला पण जाव...
तो मंदीरा चा आवारात आला..... आरती सुरू झाली होती..... टाळ्या.... घंटा... यांचा नाद सुरू झाला.....
नाद वाढत होता.... नवा सारखे आलेले लोक जागेवर घुमू लागले.... त्यात काही बायका होत्या काही  मुली.....
अचानक नितिन ला एका तरुणाने बाजूला ओढले.... नितिन ने मागे पहिलं तर एक बाई किंचाळत तिथून त्याचा बाजूला निघाली... त्या तरुणाने नितिन ला ओढल
नसत तर तिने नितिन ला धक्का देऊन पाडल असत.....
नितिन त्या बाई कडे पाहू लागला.... ती बाई तशीच पळत मधोमध रोवलेल्या खांबा चा दिशेने जाऊ लागली.... कमानी सारखे खांब रोवले होते.... दोन उभे आणि त्यांना जोडणार
मधोमध आडवा एक....
ती बाई अलगद त्या खांबावर चढू लागले.... त्या खांबाला जणू तिचे पाय चिकटत होते... कारण अलगद ती खांबावर चढली..... आणि आडव्या खांबा वर उलट लटकू लागली....
बघता बघता त्या खांबाला मुंग्या सारखे लोक येऊन लटकू लागले.... नवा पण तिथेच लटकत होता.... नितिन ने तिथून अक्षरशा पळ काढला..... आणि गाडीत जाऊन बसला...
थोड्या वेळाने सर्वजण परत आले.... नवा ला पाहून नितिन ला विश्वास बसेना... कारण तो एकदम सामान्य वागत होता....
जणूकाही त्याला काही झालच नाही..... सर्वजण परत आपल्या गावी आले....
अस म्हणतात की करणी केल्या नंतर जर ती व्यक्ति वाचली किंवा त्याने त्यावर काही उपाय केला तर ती करणी करणार्‍यावर उलट फिरते....
असच काहीसं झालं होत.... त्या बाई चा बाबतीत... जीने कोंबड्याची मान पिरगळून करणी केली होती.... तीला आता त्याचा त्रास होवू लागला होता....
मग तिने घेतला एक भयानक निर्णय..... तिने अजून एक करणी केली..... अगदी त्याच पद्धतीने.... पण यावेळी नवा सोबत तिचा पण जीव जाणे अटळ होत.....
काही दिवसांनी नितिन ला मोहन दिसला..... कसल्याशा कामाने तो त्याचा गावी आला होता.....
नितिन बोलला...,"काय पाव्हन.... कस हायत आता नवा शेठ..... "
मोहन काहीसा चेहरा पाडून बोलला....," गेला नवा....आपण परत आल्या व काही दिस व्यवस्थित गेल... मग अचानक एका राती आरडायला लागलं...
आणि काही करायचा आदि तडपुन तड्पुन जीव सोडला..... नवा चा आत्या न च केली व्हती करणी.... ती बी तवाच तशीच मेली.... "
नितिन ला हे ऐकून धक्काच बसला....... "तीन का मन तस केल...." नितिन ने विचारलं...
मोहन बोलला....,"जमिनीच वाद होत म्हणत्यात....."
मोहन निघून गेला होता.... नितिन अजूनही तसाच बसून होता....



Friday 4 March 2016

एक प्रेमवेडा

काही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला.....माझा रूममेट
चा मित्र होता......विनोद नाव होत त्याच.......मित्राचा
मित्र तो आपला मित्र म्हणून खूप
गप्पा मारल्या आम्ही.......सातार्यायचा एका लहानशा खेड्यात
राहणार.....भाषेत गावराण
गोडवा होता.....सावळा चेहरा......उत्तम राहणीमान.......यात
सर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरील
हास्य.......त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसत
होती......मग सहज मी विचारलं....,”तुम्ही कधी भूत पाहिलाय
का...??
MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय....नवीन
कोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखास
विचारतोच......तो हसला आणि बोलला....,”नाही ओ.....आपला नाही कधी संबंध
आला....”
मग माझा मित्र हसत बोलला...,”अरे
हा स्टोरी लिहितो.....भुताची राहू देत....तुझी लव
स्टोरी सांग....”
हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला.......थोडा वेळ थांबून
तो निघून गेला.....कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं
नव्हतं......
तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो.....,”अरे यार तो नाराज
झाला वाटतं....”
तो बोलला...”जाऊ दे रे....खुळा आहे तो.....एक मुलीवर प्रेम
करायचा.....ती मुंबई ची सुंदर
मुलगी आणि हा गावातला....त्या पोरीने टाइमपास
केला.....आणि दूसरा मुलगा बघून त्याचा सोबत लग्न करून
मोकळी झाली....याला दिला डच्चू.....”
अशा स्टोरी तर रोज कानावर येतात......म्हणून मी पण जास्त
विचार नाही केला.....
एके दिवशी रूम वर एकटा होतो.....इतक्यात विनोद रूम वर
आला.....काही काम होत म्हणून
आला होता.....मी त्याला बसायला सांगितलं......आणि बोलता बोलता मी त्याला त्याचा प्रेमा बद्दल
विचारलं.....खूप मागे लागल्या नंतर तो सांगू लागला.......
“मी सातार्याातील एका लहान खेड्यात
राहायचो.....जेंव्हा पासून कळायला लागलं तेंव्हा एक गोष्ट
लक्षात आली ती म्हणजे घरची गरीबी.....मजुरी करून घर
चालवणरे माझे आई वडील.....एक एक रूपया साठी झगडाव
लागायचं.....अशातच कसतरी दहावी पास झालो.....आणि आई
वडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो....मग
आमचा घराजवळ एक गवंडी होता.....त्याचाकडे मजुराच काम
मिळालं.....सिमेंट आणि वाळू कालवणे....त्याला हातात
विटा देणे.....अशी काम करावी लागायची.....पुढे शिकण्याच तर
मनातूनच काढून टाकलं होत.....फक्त जगायच म्हणून जगत
होतो....दिवसभर काम केल की अंग इतक दुखायच की हमखास न
जेवताच झोप लागायची....अशात वर्ष निघून गेल.....आता काम
चांगलं जमू लागलं होत.....पण काम कधी मिळायच तर
कधी नाही....अशातच एक दिवस एक
व्यक्ति भेटला आणि बोलला इथे काम करण्या पेक्षा मुंबई मध्ये
जा.....खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच
असत......मग मी पण ठरवलं मुंबई ला जायचं.....मुंबई मध्ये एक दूरचे
नातेवाईक रहायचे......त्यांचाकडेच काही दिवस राहायचं नंतर
आपल आपण सोय करून घ्यायची अस मी ठरवून त्याचाकडे गेलो....
मुंबई मध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात
आल.....पायात साधी चप्पल.....अंगावर दिवाळीत
घेतलेला शर्ट.....त्यावेळी वर्षातून एकदाच मी कपडे
खरेदी करायचो ते पण दिवाळीला.....तोच शर्ट घालून मी मुंबई
मध्ये आलो होतो......खूप शोधल्या नंतर
मला पत्ता मिळाला......त्यांचं घर खरच खूप सुंदर होत....एकदम
टापटीप......सोफ्यावर बसून मी इकडे तिकडे पाहू
लागलो.....तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे
आली.....नीलांबरी......हो तीच होती ती.....खूप वर्षानी पाहत
होतो तिला....किती सुंदर दिसत होती....अंगावर
गुलाबी पंजाबी ड्रेस.....लांब सुंदर केस......खूप गोरी....बोलके
डोळे.....आणि सुंदर हसत ती बोलली...,”कसा आहेस...???
ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष
वाटलं....एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझासाठी खूप मोठ
आव्हान वाटायचं....त्यात समोर निलू होती.....मला तर घामच
फुटला......
तिचा ते लक्षात आल......आणि बोलली..,”मुंबई मध्ये नवीन
आलेल्या लोकांना घाम खूप फुटतो....वातावरणच तस आहे.....”
मग मीही अडखळत का होईना.....तिचासी बोलू लागलो.....
दुसर्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम
मिळालं.....गावी करायचो तसच काम
होत....मी घरी आलो....घरी निलू एकटीच होती.....तिने
मला चहा बनवून दिला....आणि स्वत: एक कप घेऊन समोर
बसली.....चहाचा एक एक घोट घेत ती बोलू लागली......आणि तिने
विचारलं...,”तुझ शिक्षण काय झालय रे...???
तिचा या प्रश्नाने मी गोंधळलो......मी तर फक्त दहावी पास
होतो.....अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटली.....
क्षणभर थांबून बोललो....,”दहावी......”
तिचा चेहर्यानवर काहीच भाव बदलले
नाही......ती बोलली...,”पुढे का नाही शिकलास...??
मग मी तिला माझी पूर्ण हकीकत
सांगितली......घरची गरीबी....कर्ज....छोट घर.....
तिने माझ पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं
आणि बोलली...,”या जगात जो कारण सांगतो.....तो काहीच करू
शकत नाही.....नुसता रडत बसतो आयुष्यभर......गरीब घरात जन्म
झाला यात नक्कीच तुझा दोष नाही....पण गरीब राहूनच जर
मरनार असशील तर यात फक्त तुझा दोष आहे.....”
मी हसलो आणि बोललो.....,”अग असली मोठ मोठी वाक्य मी पण
खूप ऐकलेत आणि वाचलेत......अशा वाक्यांनी पोट भरत
नाही......त्यासाठी कामच कराव लागत.....”
ती बोलली.....,”ठिकय....मग मला सांग....तू जे काम करतोय त्याने
किती फरक पडणार आहे तुझा आयुष्यात......पुढे जाऊन
तुझा मुलगा पण हेच बोलणार बापाने काही केल नाही.....आयुष्य
फुकट घालवल.....”
तीच हे वाक्य मनाला खूप लागलं....
मी काहीसा रडवल्या सुरात बोललो.....,”अग मग मी काय करू....”
ती बोलली....,”सर्वात आधी तुझ शिक्षण पूर्ण
कर.....बारावी बाहेरून पण देता येते.....काम करत करत
थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण
नसते......”
तीच बोलणं पटल मला......त्याच वेळी ठरवलं गावी परत यायचं
मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करायच....
मी गावी आलो.....बारावी ला अॅडमिशन घेतलं.....मिळेल ते काम
करू लागलो.....तिचा कडे त्यावेळी मोबाइल नव्हता....घरात एकच
मोबाइल होता.....तीचाशी बोलता याव म्हणून मी मोबाइल
घेतला......आणि एकदा फोन लावला.....तिचा आईने
उचलला.....सर्वांशी बोललो.....शेवटी निलू
शी बोललो आणि तिला सांगितलं की अॅडमिशन घेतलं
बारावी ला.....खूप खुश झाली ती.....नंतर घरात कोणी नसल
की ती मला फोन करायची.....खूप
गप्पा मारायचो आम्ही......तिचा आवाज ऐकल्या शिवाय जेवू
वाटत नव्हतं.....मला ती आवडू लागली होती.....
पण बोलणार
तरी कस.....मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र.....ती शहरात
राहणारी सुंदर फुलाची कळी.....आणि मी गावात
वाढलेला जणूकाही बाभळीचा काटा.......कुठेच आमच जमण्यासारख
नव्हतं....पण मी मना पासून प्रेम करू
लागलो होतो तीचावर.....अशातच मी चांगल्या मार्काने
बारावी पास झालो.....सर्वात आधी तिला फोन केला......ती खूप
खुश झाली.....आणि बोलली......,”पार्टी हवीय....”
मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबई ला गेलो.....आमच
बाहेरच भेटायचं ठरलं.....ती आली.....खूप सुंदर दिसत
होती ती.....पार्टी करायची म्हणून मी थोडे जास्तच पैसे घेऊन
गेलो होतो......
ती बोलली....,”मला पाणीपुरी खायची आहे....”
मग आम्ही पाणीपुरी खाल्ली तीस रुपये बिल झाल
फक्त....तिला बोललो....”चल कुठेतरी जेवू.....”
ती बोलली....,”किती पैसे आणलेत....”
मी बोललो....,”आहेत तीन हजार....”
ती बोलले...,”ठिकाय चल मग.....”
ती मला एका कपड्याचा दुकानात घेऊन
गेली.....आणि माझासाठी मस्त तीन शर्ट आणि दोन जीन्स
निवडले......आणि बोलली...,”किती वेड्या सारखा राहतोस.....हे
घालत जा.....मस्त इन्सर्ट करून....मला बाकी काहीच नको....”
मी गावी आलो....माझा राहणी मानात खूप बदल
झाला होता......
मी पुढे सिविल मधेच डिप्लोमा करायचं ठरवलं,,,,,
पण मला माझा मनातील सर्वकाही तिला सांगायचं
होत.....आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं.......
आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो....,”तुला एक
सांगू....राग तर नाही येणार.....”
“नाही रे बोल तू...”ती बोलली....
“मला तू खूप आवडतेस......खूप बर वाटत
तुझाशी बोलून.....”बोलता बोलता माझा ह्रदयाचे ठोके वाढले
होते.....
“हो मला पण तुझाशी बोलायला आवडतच..म्हणून तर बोलते न.....”
ती बोलली....
कदाचित तिला माझ बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न
कळल्या सारखं करत होती....म्हणून मी सरल बोललो.....
“लग्न करणार माझाशी......???
क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली.......
माझा ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते.....एवढ्यात तिकडून
आवाज आला.....
“हो..........................................”
आणि तिने फोन कट केला......
मी अक्षरशा आनंदाने नाचू लागलो.....त्या रात्री एक क्षण
सुद्धा झोप नाही लागली....फक्त उघड्या डोळ्यांनी तीचच
स्वप्न पाहत होतो......
सकाळ झाली.....साधारण अकरा वाजता तिचा फोन
आला.....आम्ही बोलू लागलो.....
तिचा आवाज
थोडासा वेगळा वाटला ती बोलली....,”विंनू.....माझ खरच रे
तुझावर खुप प्रेम आहे....आणि तुझा सोबत आयुष्य जगायला खूप
आवडेल मला.....पण माझ माझा आई बाबांवर पण खूप प्रेम
आहे...त्यांचा शब्दाबाहेर जाणार नाही मी.....मी तुला आज
हो बोलले आणि पुढे जर आपल लग्न नाही होवू शकल तर....???
त्यापेक्षा आपण मित्रच राहू.....आणि मी वाट पाहीन
ज्यावेळी तू स्वत: माझा हात माझा बाबांजवळ मागशील......”
तीच बोलण्यात प्रामाणिक पणा होता....आई
बाबा बद्दलची काळजी आणि प्रेम होत......एकूणच प्रतेक
गोष्टीचा सर्वांगाने विचार
करणारी मुलगी होती ती......मी ठिकाय बोललो आणि फोन
ठेवला......
तिचा होकाराचा चौदा तासा नंतर तिचा हा फोन
आला होता.....ते चौदा तास माझा आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण होते.....तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय
केला.......
डिप्लोमा करत नोकरी करू लागलो......आता चांगल्या पदावर
नोकरी मिळाली होती.....पार्ट टाइम मध्ये पॉलिसी काढायच
काम पण मी करू लागलो....बरेच पैसे कमवू
लागलो.....तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो...थोड थोड
करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं......गावातील
लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू
लागलं.....की नक्की करतोय
तरी काय.....इतका कसा सुधारला....एखाद्या भुताने पछाडल
की काय.....पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम
नावाचा भुताने पछाडलेल.......खूप वेळा कमावरून
घरी आलो की खूप वैताग यायचा.....पॉलिसी काढायच काम
असायचं पण जाऊ वाटत नसायच.....अशावेळी मी डोळे झाकून
तिचा चेहरा डोळ्या समोर आणायचो......तिला मिळवायचच उठून
लगेच कपडे बदलून कामाला लागायचो......दिवसातील वीस वीस
तास काम केल.......
एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला.....निलू
या छोट्या घरात कशी राहणार......माझा जवळ काही पैसे
शिल्लक होते.....सर्व पैसे गवंडीला दिले....त्याचाकडे आधी काम
केलच होत मी.....त्याला सांगितलं की मला चांगलं घर बांधून
हवय......मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठ घर
बांधलं.....बस.....माझा मनासारखं घरट तयार झाल होत.........
निलू पण खूप खुश होती.......पण एक दिवस तिने मला सांगितलं
की तिचा घरचे तिचासाठी स्थल बघत आहेत......मी माझा आई
बाबा कडून तिला मागणी घातली......
पण तिचा घरचांनी नकार दिला......का...?? तर त्यांचा नजरेत
अजूनही आम्ही गरीब होतो....खूप प्रयत्न केला....पण त्यांचं मन
काही बदललं नाही........
आणि मुंबई मधीलच एक
नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिचासाठी पाहिला......तिचा लग्नाची तारीख
ठरली.....
आणि एक दिवस ती गावी आली......माझा घरी आली.....
आईने चहा दिला तिला.....
मी बाहेर
उभा होतो.....भिंतीला टेकून......ती निघाली आणि बोलली....,”छान
बांधलस घर,,,,”
माझा गळा दाटून आला होता तरी स्वत:ला सावरत
बोललो......,”कुठल आणि कसलं घर,....तुझाशिवाय सर्व
काही अपूर्णच आहे.....फक्त सीमेंट आणि विटाचा भिंती आहेत.....”
“अस नको रे बोलूस....झालच तर मला माफ कर.....मी काहीच करू
शकले नाही.....” तिचा डोळ्याचा कडा ओल्या झाल्या होत्या......
ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पहिलं
आणि बोलली....,”विसरणार तर नाही ना रे मला....”
ती रडत रडत निघून गेली......
मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो.......
याचवर्षी मे मध्ये तीच लग्न झाल........
माझ आयुष्य जणूकाही उध्वस्त झाल........
का आणि कशासाठी जगायच हेच कळलं नाही.....जॉब साठी म्हणून
पुण्यात निघून आलो......
बस आता तिचा आठवणीत जगायच.......
माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवल.....पण तिने तर
खूप आधी मला सांगितलं होत....आई बाबांचा शब्दाबाहेर जाणार
नाही म्हणून.....माझा सोबत पळून येऊन आई बाबांची अब्रू
तिला धुळीस मिळवायची नव्हती.......
काहीजण बोलतात तिने माझा सोबत टाइम पास केला....पण
माझासाठी तो बेस्ट टाइम होता.....तिचाशी बोललेला एक एक
शब्द माझासाठी अविस्मरणीय होता........
तिला वाईट बोलणार प्रतेकजण मला माझा दुश्मन वाटतो........
ती जर माझा आयुष्यात आली नसती तर मी आजही दहावी पास
आणि सिमेंट मध्ये काम करणारा मजूर असतो......आणि त्याच
छोट्या घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो.......
माझासाठी खूप काही केल तिने......कसलीच अपेक्षा न ठेवता....
मी सर्व देवांचा मंदिरात जाऊन आलो......प्रतेक मंदिरात जाऊन
हात जोडून
फक्त आणि फक्त तिला मागितल.....पण
एकही देवाला माझी दया नाही आली....
आजही मी मंदिरात
जातो आणि तिचा सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो............”
बोलता बोलता त्याचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं
होत........नकळत माझे पण डोळे पाणावले होते......
प्रेम यशस्वी नाही झाल म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जन
पहिले होते......पण मनापासून प्रेम
करणारा आणि त्या मुलीचा सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदा पाहत
होतो.......
.......................................हासीम..............................