Monday 17 August 2015

पिशाच्चीणी

अस म्हणतात की वाईट काम करणार्‍या लोकांना कधी न कधी त्या वाईट कामच फळ हे मिळतच...पण अशा लोकांचं काय होत असेल ज्याने पूर्ण जीवनभर फक्त आणि फक्त वाईटच काम केल असेल...??

राजस्थान मधील जोधपूर हे शहर...या सुंदर शहरापासून काही मैल अंतरावर असलेल एक छोटसं गाव..सगळीकडे फक्त वाळवंट पसरलेलं....मधेच एखाद वाळलेल झाड...अशाच प्रकारच ते गाव..राजस्थान मध्ये जवळ जवळ अशाच प्रकारची गाव पाहायला मिळतात....पण हे गाव काहीसं खास आहे...कारण या गावात एक बाई राहते..जी पैशासाठी काहीही करायला तयार असते...ती कोणालाही तिचा मंत्र शक्तिद्वारे मारून टाकू शकते किंवा कायमचा अपंग ही बनवू शकते....मुंबई मध्ये राहणार्‍या रोहितने एक दिवस आपल्या मित्राकडून त्या बाई बद्दल ऐकलं आणि त्याचा मनात असलेल्या सूडाचा भावनेने पेट घेतला...

2-3 वर्षापूर्वीची रोहित कॉलेजमधे असताना तिची क्लासमेट स्वातिचा प्रेमात पडला..पण ज्यावेळी रोहितने तिला त्याचा प्रेमाबद्दल सांगितलं तेंव्हा तिने सर्वांसमोर रोहितचा खूप अपमान केला...तो अपमान रोहितचा खूप जिव्हारी लागला...पण त्याने विचार केला...जाऊ दे..कदाचित आपण तिचा लायक नाही...पण काही दिवसानी स्वाति अमर नावाचा मूलासोबत फिरताना दिसू लागली...मग मात्र त्याचा पूर्ण अंगात आग लागली...त्याचा पूर्ण जळफाट होवू लागला...दिवस असेच निघून जात होते..

कॉलेज संपवून रोहित जॉबला लागला...आणि एके दिवसी रोहितने फेसबूक वर स्वाति आणि अमरचा फोटो पाहिला...त्याला काय कराव सुचत नव्हतं..काहीही करून स्वातिला परत मिळवायच...हेच त्याचा मनात चालल होत....याच दरम्यान त्याचा एका मित्राकडून त्याला त्या बाई बद्दल कळलं जी तंत्र विद्याचा सहाय्याने आत्म्यांना वश करू शकत होती आणि त्यांचा व्यवहार ही करायची.....

रोहितने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या बाईला भेटण्यासाठी निघाला....तो प्रेमामुळे आंधळा झाला होता की सूडाचा भावनेमुळे हे सांगता येणे खरच कठीण आहे...पण त्यावेळी त्याने ते करायचं निर्णय घेतला जे त्याचसाठी येणार्‍या काळात खूप धोकादायक होत......
तो त्या गावात तर पोहचला पण गावातील कोणालाही त्या बाईबद्दल विचारलं तर ते नाही माहीत म्हणून पळतच निघत..शेवटी एका व्यक्तिला पैशाचं लालूच दाखवून तीच घर दाखवायला तयार केल...गावाबाहेर एका डोंगराळ भाग दाखवून तो व्यक्ति निघून गेला.....रोहित हळूहळू चालत पुढे जाऊ लागला...जसजसा तो पुढे जात होता..तसतसा एक उग्र वास त्याला येऊ लागला..एक क्षण तर मनात आल की परत फिराव पण स्वातिला परत मिळवण्यासाठी तो चालतच राहिला....दिवस मावळला होता तरीही अंधुकसा प्रकाश अजून होता....त्याने समोर पहिलं तर एक झोपडी होती...तिथिल वातावरण पाहून तो खूप घाबरला...सगळीकडे राख पसरली होती...सडलेल्या मांसाचा वास त्याला येत होता...त्याने रुमाल नाकाला लावलं आणि झोपडीत आत डोकावून पहिलं...आत तीन दगड मांडून केलेली चूल होती...झोपडीचा आत एक दिवा होता...

अचानक त्याला मागून कोणीतरी जोरदार धक्का दिला तो कोलमडून आत पडला.....त्याने पडल्या पडल्या मागे दारात पहिलं तर...त्याचा अंगाचा थरकाप उडाला...समोर एक धिप्पाड देहाची कालीकुट्ट बाई उभी होती....मोकळे सोडलेले तिचे ते केस...पण तिचा केसातून त्याला फक्त तिचे भयंकर डोळे...आणि नाक दिसत होत......तिचा दंडावर..गालावर..वेगवेगळे चित्र विचित्र नक्षी काढलेल्या होत्या...तिचा एका हातात मांसाचा तुकडा होता...रकताळलेला... जणूकाही आत्ताच तिने तो कापून आणला असावा..दात ओठ खात ती बोलली....कोण आहेस तू....???(राजस्थानी भाषेत) रोहित क्षणभर गोंधळला मग त्याने त्याचा येण्याचं कारण सांगितलं...आणि ती मागेल तेवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिल........

मग ती तयार झाली...कोपर्‍यातील हाड आणि कवटी तिने उचलली...कवटी मधे ठेवून हाडाने कसल्याशा रेघा ओढल्या तिने...आणि आपल्या घोगर्‍या आवाजात जोरदार मंत्र बोलू लागली...आणि अंग झुलवू लागली...तिला पाहून रोहित आधीच घाबरलेला होता.... आता तर त्याचा पूर्ण अंगाच पाणी पाणी झाल होत...एका तासानंतर ती बाई शांत झाली...आणि त्या कवटी मधे हात घालून एक लिंबू बाहेर काढला....आणि जवळच असलेली टाचणी त्यात खुपसली....तो लिंबू तिने एका काळ्या कपड्यात गुंडाळून रोहितकडे दिला आणि बोलली....काहीही करून 10 दिवसाचा आत या लिंबाचा रस स्वातिला पाज...हा रस पिल्यानंतर 5 दिवसात ती तुझी होवून जाईल...पण 10 दिवसात जर तू तिला रस नाही पाजलस तर अनर्थ होईल...एवढं बोलून तिने रोहितला तिथून हाकलूनच लावलं....

रोहित खूप आनंदात परत आला...पण या आनंदाचा भरात त्याने हा विचारच नाही केला की स्वातिला लिंबुच रस पाजायच कस...??कारण कॉलेज नंतर ती त्याला कधी भेटलीच नव्हती....फक्त फेसबूकमुळे त्याला अस वाटायचं की ती जवळच आहे...10 दिवस त्याने खूप प्रयत्न केला तिला भेटायचा....पण त्याच दुर्दैव की स्वातीच सदैव म्हणावं त्या 10 दिवसात ति फेसबूक वर आलीच नाही....मग जे व्हायचं तेच झाल...10 दिवस निघून गेले...
त्याच विचारात काम करत असताना ऑफिस मधे त्याचा कडून एक खूप मोठी चूक झाली...म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल...मग तो लगेच त्या बाईला भेटण्या साठी त्या गावात आला...

तो झोपडीत शिरला समोर पहिलं तर ती बाई पालथी झोपली होती....त्याने तिला हाक मारली पण तीचाकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला...म्हणून तो जवळ गेला आणि तिचा हात पकडून सरल करायचा प्रयत्न केला पण.........हात पकडताना त्याची बोट तिचा हातात घुसली....तीच पूर्ण शरीर सडल होत...तिचा शरीरातून रक्त नव्हे तर पू बाहेर पडत होत...मागोमाग त्यातून वितभर लांब अळ्या बाहेर पडू लागल्या....रोहित किंचाळातच मागे सरकला...त्या वळवळणार्‍या अळ्याना पाहून त्यांचा अंगावर शहारा आला...तो तसाच पळत बाहेर आला...त्याने बॅगेत हात घालून तो लिंबू बाहेर काढला तो लिंबू सुद्धा सडला होता...अगदी त्या बाईसारख.........तो लिंबू तिथेच फेकून तो परत आला...आणि पुन्हा कधी अशा मार्गाला न जाण्याचं त्याने ठरवलं.......

ती बाई नक्की का मेली हे तस पहिलं तर गुढच आहे..पण एक म्हणता येईल.... तिची काली जादू तिचावरच उलटली....आज जेंव्हा रोहित भेटतो तेंव्हा बोलतो....सर सलामत तो पगडी पचास......म्हणजे जीवंत राहिलो तर दुसरी स्वाति पटवेन....नुकतच त्याच लग्न पण झाल...नशीब त्याच फक्त नोकरीवरच निभावल.............

No comments: