Sunday 14 February 2016

कस्तुरी निशाद

निशाद.......एक टिपिकल मुंबईकर तरुण..मित्रांसोबत दंगा मस्ती करणे..फिरणे..मस्त आयुष्याची मजा घेणे..हेच त्याला माहित होत..आपण प्रेमात पडणं शक्यच नाही, असं अगदी तो पैजेवर मित्रांना सांगायचा....एवढं असूनही खूप हुशार होता तो...पूर्ण डबघाइला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्व:ताच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता...

एखाद्या मुलीचा आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं, यावर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता....अशात एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली.....”कस्तुरी”........... खूप सुंदर, बोलकी,खेळकर,निरागस डोळे...निशाद तर पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला.....आयुष्यात पहिल्यांदा.....कस्तुरीलाही तो खूप आवडला...

असेच प्रेमातील काही सुखाचे दिवस गेले, मग त्यांनी ठरवलं, की आता लग्न करायचं. पण दोन्ही घरातून विरोध हा होताच...मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मैरेज केल...जवळच्या मित्रांनी साथ दिली,त्यांना.....पण...... निशादचे वडील खूप भडकले आणि निशाद आणि कस्तुरीला घरात घेण्यास नकार दिला.....खूप वाईट वाटलं दोघांना.....

अशा अवस्थेत त्यांनी भाड्याने खोली घेतली आणि संसाराला सुरवात केली...एकमेकांना दिलासा देत. दोघेही आपल्या सुखी संसारात रमू लागले. निशाद दुखी वाटला, की कस्तुरी त्याला हसवायाची....आणि कधी घरच्या आठवणीने कस्तुरी उदास असली, की निशाद तिला आधार द्यायचा......असच पडत...आणि मग स्व:ता उठत....स्व:ता रडत आणि मग स्व:ताच्या रडण्याला हसत....निशाद ऑफिसला जात असला, की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची...
आता 2 वर्ष झाली होती त्यांचा लग्नाला..या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्व:तची नाराजी दूर केली आणि त्या दोघांचा स्वीकार केला होता... ते दोघेही खूप सुखी होते आपल्या जगात.....पण......... अचानक एक दिवस कुणाची तरी त्यांना नजर लागली..... कुणाला तरी त्यांचं सुख पाहवत नव्हतं.....

एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना...अचानक कस्तुरीला जाग आली..कस्तुरी खूप घाबरट होती..म्हणून कायम घरातील लाइट चालू ठेवून झोपायची....पण तिने पहिलं तर सगळीकडे अंधार होता...खूप घाबरली ती..पण तिने निशादला नाही उठवलं..नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट म्हणून चिडवेल म्हणून....ती बेड वरुन उठली..अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं...तिने घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते...कशीबशी चाचपडत तिने लाइटचा स्विच ऑन केला...पण स्विच तर ऑनच होता...कदाचित लाइट गेली असावी म्हणून तिने खिडकी बाहेर डोकावलं.....तर क्षणभर तिचे श्वासच थांबले....बाहेर कोणीतरी होतं...तीन स्त्रिया होत्या....एक वयस्कर...एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती......त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या...त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा होता...त्यापैकि दोघी साडीवर होत्या आणि ती तरुण मुलगी ड्रेस वर होती...त्यांचे चेहरे एकदम पांढरट होते....त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली....जवळ जवळ किंचाळतच तिने निशादला हाक मारली....निशाद खडबडून जागा झाला...आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं...”काय झाल?”
कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली..”ते बघ!! त्या बायका कशा बघत आहेत”
निशादणे समोर पहिलं तर कोणीच नव्हतं...तो बोलला..”कुठे ग ?”
कस्तुरी वैतागून बोलली,”अरे ते बघ ना समोर..”
निशादला काहीच कळेना..त्याने कशीबाशी तिची समजूत काढली आणि तिला झोपवलं....
दुसर्या दिवशी नेहमी प्रमाणे निशाद ऑफिसला गेला...पण त्या दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली..ती निशादला काही न सांगता डॉक्टरकडे गेली...डॉक्टरने तिला काही टेस्ट करायला सांगितल्या...रीपोर्ट दुसर्या दिवशी मिळणार होते...ती घरी आली...निशाद उगीचच टेंशन घेईल म्हणून तिने त्याला काही सांगितलं नाही....

त्या रात्री कसल्याशा आवाजाने कस्तुरीला जाग आली...लाइट गेलेलीच होती...पूर्ण अंधार होता खोलीमधे....घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते..अगदी कालसारखंच होतं.सर्व पण का कुणास ठाऊक तिचे पाय आपोआप खिडकीकडे वळले...तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहीलं, तर तिच्या पायाखालची जमिनीच सरकली....कारण कालच्याच त्या तीन स्त्रिया आज फक्त काही अंतरावार उभ्या होत्या...तीच त्यांची भयानक एकटक नजर...आणि अचानक त्यांचातील वयस्कर स्त्रीने मूठ आवळली आणि तिचा मुठीमधे काहीतरी होत...तिने ते पूर्ण आवळल आणि एकदम कस्तुरीचा अंगावर फेकलं ...कस्तुरी या अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निशादला उठवू लागली...निशाद उठला त्याने बाहेर येऊन पाहीलं पण त्याला कोणीच नाही दिसलं....कस्तुरी खूपच घाबरली होती...आणि सारखी बडबडत होती..."त्या बाईने माझा अंगावर काहीतरी फेकलं"...म्हणून....
निशाद तिला समजावू लागला...’’अग..कोणी नाही तिथे..भास झाला असेल तुला..’’
पण कस्तूरीला माहीत होतं...तो भास नाहीये....
दुसर्या दिवशी सकाळी निशादची खूप महत्वाची मीटिंग होती...त्याला ऑफिसला जाणं गरजेचं होत...कारण त्याला माहीत होत, की आज त्याच प्रमोशन होणार आहे...पण याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं..सर्प्राइज देणार होता तो तिला...तो ऑफिसला निघाला..नेहमीप्रमाणे कस्तुरीने खिडकीतून त्याला बाय केलं....निशाद गेल्यानंतर ती लगेच डॉक्टरकडे गेली, कारण आज तिचे रिपोर्ट्स तिला मिळणार होते....
ती डॉक्टर कडे गेली... डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट्स वाचल्या आणि सोबत कोणी आहे का? विचारलं...कस्तुरीचा मनात शंकेची पाल चुकचुकली....
ती बोलली...”कोणी नाही..माझे हजबंड..ऑफिस मधे गेलेत..मला सांगाना काय झालं?..”
डॉक्टर बोलले...”तुमचे पती जर तुमच्या सोबत असते..तर बरं झालं असतं..”
पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती...तिने हट्ट्च केला की," रीपोर्टमधे काय आहे ते सांगा" म्हणून... डॉक्टरांनी मग पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला....कस्तुरीने डॉक्टरच म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं...आणि रिपोर्ट घेऊन घरी निघाली...पण तिचे पाय खूपच जड झाले होते...डोळ्यात पाणी होतं...आणि डॉक्टरचे शब्द कानात घुमत होते....

इतक्यात तिचा फोन वाजला..निशादचा फोन होता....तिला खूप रडू येत होत..पण तिने स्व:ताला आवरलं...आणि फोन उचलला.....तिकडून निशाद खूप आनंदात बोलत होता....”कस्तुरी...अगं माझ प्रमोशन झालं..”
कस्तुरी हसली आणि बोलली..’’अभिनंदन!!....”
निशादने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं...काहीतरी प्रॉब्लेम झालाय.....तो बोलला,”काय झालं...कस्तुरी..रडतेस का...?”
कस्तुरी डोळे पुसत बोलली..”अरे मी कुठे रडतेय..तुझ आपलं काहीतरीच..”
निशदला ते पटलं नाही तो बोलला...”तुला माझी शप्पथ कस्तुरी...सांग काय झालं..?”

यावेळी मात्र तिला हुंदका आवरता आला नाही...आणि रडत रडत बोलली...”निशाद मी मरणार आहे रे.!!..फक्त तीन महीने आहेत माझाकडे.!!!..”

निशादच्या पायाखालची जमीनच सरकली...डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला...पायातील पूर्ण त्राण निघून गेला आणि तो मटकण जागेवर बसला....त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं....कस्तुरी अजूनही रडतच होती...मग तीनेच फोन कट केला....कस्तुरी घरी आली....खूप रडली ती...कारण तिने ठरवलं होतं, की निशादसमोर रडायचं नाही..किती स्वप्न पहिले होते तिने आणि निशादने...पण डॉक्टरांनी तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं...ते पण लास्ट स्टेज...तिचापण यावर विश्वास बसत नव्हता....3 महीने दिले होते तिला आता देवाने...जगण्यासाठी!!
इकडे निशाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला...कारण त्याने पण ठरवलं होतं, की कस्तुरीसमोर रडायचं नाही..नियतीने खूप क्रूर चेष्टा केली होती त्याची...आता कुठे संसार सुरू झाला होता...सुखाचे दिवस येणार अस दिसत होत पण.......का...??? आपल्याच बाबतीत नियतीने अशी चेष्टा का करावी...?? याचाच विचार तो करत होता...पण त्याला कस्तुरीचा चेहरा आठवला...नाही...3 महीने खूप खुश ठेवायच तिला....मीच जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार...असा विचार करून तो उठला...आणि घरी गेला...

कस्तुरीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने त्याचं स्वागत केलं...दोघांचे डोळे रडून रडून सुजले होते...पण ओठावर उसनं हसू होतं...कस्तुरी त्याला बोलली..”मरण तर प्रत्येकाचं निश्चित आहे...यात माझा नंबर लवकर लागला..त्यात काय? एवढं..तस पण मला म्हातारी होवून मरायचं नव्हतं....” आणि स्व:ताच मोठ मोठयाने हसू लागली...निशादला तिच्याकडे पाहू लागला...ओठ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला....पण डोळ्यांनी साथ नाही दिली...आणि त्यातून पाणी आलं. कस्तुरीही हसता हसता कधी रडू लागली तिला पण नाही कळलं......तिने निशाद पाणी आलं मांडीवर डोक ठेवलं आणि रडत रडत म्हणाली....मला नाही रे मरायचं...मला जगायच आहे रे तुझ्यासोबत....खूप जगायचं आहे..तुझासोबत हसायचं आहे...तुझासोबत रडायचं आहे....मला तुझी साथ द्यायची आहे रे...आयुष्यभर...”
दोघे एकमेकांना बिलगून खूप वेळ रडत होते....त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले....रात्री ते झोपले असताना...कस्तुरीला जाग आली....तिने घड्याळ पहिलं....3 वाजले होते...तिला मागचे दोन दिवस आठवले...आणि तिचा आंगावार शहारा आला...आज पण असतील का त्या स्त्रिया खिडकीत....तिने स्व:ताशी विचार केला...आणि कसलासा विचार करून ती उठली आणि खिडली उघडण्यासाठी हात लावणार.......इतक्यात खिडकी आपोआप उघडली...तिने समोर पहिलं तर त्या तीनही स्त्रिया खिडकीला एकदम चिकटून उभ्या होत्या...आणि त्यांची ती नजर....अजूनही कस्तुरीला एकटक पहात होती....कस्तुरी निशादला हाक मारू लागली... त्या स्त्रिया आज तिला हातवारे करून खुणावत होत्या...निशाद तिचाजवळ गेला....कस्तुरी ओरडू लागली....”त्या बघ बायका मला खुणावत आहेत...मला घेऊन जायला आल्यात त्या....” पण निशादला मात्र समोर अजूनही कुणीच दिसत नव्हते. शेवटी ती रात्र दोघांनीही . तशीच जागूनच काढली….

निशादला काहीच सुचत नव्हतं..काय करावं ते....आतून पूर्णपणे तो मोडला होता....कस्तुरीचा आजार...आणि तिला होणारे भास...सगळीकडून एकदमच संकट आली होती त्याच्यावर....त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला...
दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा...पण रात्रीचे 3 वाजले की कस्तुरीला हमखास जाग यायची...कधी रडायची...ओरडायची आणि म्हणायची,” त्या बायका मला नाही सोडणार...त्या मला घेऊन जाणार..निशाद...त्या मला नाही सोडणार....”.अशा कित्येक रात्री निशादने जागून काढल्या होत्या....पण समोर मार्गही काही दिसत नव्हता.....
एके दिवशी कस्तुरीचे बाबा तिला घ्यायला आले...तिच्या आजारपणाबद्दल निशादने फोन करून सांगितलं होतं...आणि तिला होणाऱ्या भासांबद्दलही त्याने तिच्या बाबांना कल्पना दिली...तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले...निशाद त्यांना स्टँडवर सोडायला आला..दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला....निशादनेही सुट्टी काढून गावी येण्याच वचन दिलं..... कस्तुरी खिडकीचा कडेला बसली होती… बस थोडी पुढे गेली असेल......इतक्यात तिची नजर बाहेर गेली...त्या तीन स्त्रिया भर दिवसा तिच्यापासून काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बस सोबत येत होत्या....कस्तुरी बसमध्येच किंचाळू लागली....”बाबा त्या बघा बायका...मागे मागे यायला लागल्यात...माझा पिच्छा सोडत का नाहीत त्या...बाबा त्या बायका मला घेऊन जाणार....” अशी काहीही ती बडबडू लागली...बाबांनी बाहेर पहिलं तर त्यांना काहीच दिसलं नाही...बाबा तिला शांत करू लागले...पण ती जास्तच बडबडू लागली...आणि बाबाचा मांडीवर डोक ठेवून झोपली......

गावी आल्या नंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री तीनच्या सुमारास दिसत होत्याच....पण त्या बायका कोण आहेत?...तेच कळत नव्हतं.... तिच्या आजारपणानेपण आता त्याचे रंग दाखवायला चालू केलं होतं... काही दिवसांनी निशाद सुट्टी टाकून तिच्याकडे आला...आणि तिची अवस्था पाहून हादरलाच......फक्त 10 दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची........फक्त बेडवर झोपून असायची...गोरीपान दिसणारी कस्तुरी... पण आता तिच्या चेहऱ्यावरचं तेजच नाहीसं झालं होतं...डोळे खोल आत गेले होते....हातापायाची त्वचा पूर्ण हाडाला चिकटली होती...जणूकाही फक्त हाडाचा सापळाच शिल्लक होता....निशादचा डोळ्यात अश्रु उभे राहिले त्याला तिची ती अवस्था पाहवत नव्हती...

तो दिवसभर बसून तिचाशी गप्पा मारायचा...तिला हसवायचा प्रयत्न करायचा...एक दिवस कस्तुरी निशाद्ला बोलली,”माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील..??”
तिचा “शेवटची इच्छा” हा शब्द त्याचा काळजाला चिरून गेला..........
तो क्षणभर घुटमळला...आलेला आवंढा गिळून बोलला..”बोल ना गं..”
कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याचा हातावर हात ठेवला आणि बोलली...”मला वचन दे.. माझ्यानंतर तू खूप दु:ख करत बसणार नाही...आणि मी तुझासाठी 2-3 मुली पाहिल्यात त्यातील जी आवडेल तिचा बरोबर लग्न करशील?..”
निशादला स्व:तावर नियंत्रण ठेवता नाही आलं....आणि खूप रडला तो...कस्तुरी शिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती........

त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती....ऑफिसमधे जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला गेला...जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला.........पण...........ती भेट ही त्या दोघांची शेवटची ठरली...कारण त्याच रात्री 3 वाजता कस्तुरीने जीव सोडला.......3 महिन्याचा डाव 2 महिन्यातच संपला होता....

निशाद....आहे तसा परत आला....अंत्यविधी झाला....रडून रडून त्याचा डोळ्यातील पाणी आटलं होतं....सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईमधे आला........ते घर त्याला आता खायला उठत होत...त्या घरातील भिंती..पडदे...आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तु...जणूकाही निशादला विचारत होते.....कस्तुरी कुठे आहे?.....पण त्याचं उत्तर निशाद कडे नव्हतंच.......
तो तसाच न जेवता झोपी गेला....अचानक त्याला जाग आली... घडयाळात पाहिलं 3 वाजले होते...पाय आपोआप खिडकीकडे वळले...त्याने खिडकी उघडून समोर पहिलं...तर त्याला धक्का बसला...कारण समोर तीन स्त्रिया उभ्या होत्या...हुबेहूब जशी कस्तुरी सांगायची.....याचा अर्थ खरच...कस्तुरीचा बळी या तिघींनी घेतला होता का..?? आता या मला पण नाही सोडणार का..?? एका क्षणात कित्येक प्रश्न त्याचा मनात आले.......पण.........इतक्यात तिथे चौथी आकृती दिसली.. काहीशी तेजोमय...त्या चौथ्या आकृतीच्या आगमनाने या तिन्ही आकृती जणूकाही गायबच झाल्या....ती आकृती...निशादला ओळखीची वाटली....कस्तुरी....हो कस्तुरीच आहे ती........निशादने जोरात हाक मारली..........पण....तोपर्यंत ती आकृती निघून गेली होती.......पण त्या दिवसांनंतर कधीच त्या तीन स्त्रिया निशादला दिसल्या नाहीत......

निशादने काही ठिकाणी विचारलं तेंव्हा अस सांगण्यात आलं, की त्या तीन बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या....कस्तुरी नंतर त्या निशादला पण घेऊन जाणार होत्या पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही.....

ही कथा स्व:ता निशादने मला भेटून सांगितली...2-3 तास तो स्व:ताबद्दल आणि कस्तुरीबद्दल सांगत होता...निशाद तुझ्या भावना शब्दात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...काही चुकलं असेल तर माफी असावी....निशादला मी MHE परिवारकडून एकच सांगेन...”हरिण आयुष्यभर कस्तुरीचा शोध घेत असतं...कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो..पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही, की सुगंध देणारी कस्तुरी त्याच्यातच आहे...निशाद तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे..कुठेच नाही गेली ती... तुझ्या आयुष्यात कायम सुगंध रूपाने ती राहील......कदाचित ती तुला कधी दिसणार नाही पण तिचा सुगंध नेहमी तुझासोबत राहील......

No comments: